शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागनाथ येथे शेतकऱ्यांना हवा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:54 PM

उद्योगांनाही मिळेल पाणी : २५ गावांसह हजारो हेक्टर जागा येईल ओलिताखाली

वाडा : तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी अशा पाच नद्या वाडा तालुक्याला लाभल्या आहेत. मात्र पाण्याबाबत योग्य नियोजन नसल्याने या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. नियोजनाअभावी हा तालुका आजही तहानलेलाच आहे. खानिवली परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, सिंचनासाठी पाणी तसेच उद्योजकांचा पाण्याच्या प्रश्न सोडवायचा असेल, तर वैतरणा नदीवर नागनाथ येथे बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वैतरणा नदी किनारी आंबिस्ते गावाच्या हद्दीत नागनाथ हे देवस्थान आहे. या देवस्थानच्या जवळून वैतरणा नदी गेली असून हे देवस्थान उंच टेकडीवर आहे. नदीचा भाग खोल असून येथे मे-जून या अखेरच्या क्षणीही मुबलक पाणी साठा असतो. येथे एक मोठा बंधारा बांधल्यास त्याचा फायदा खानिवली परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी तसेच उद्योजकांना होऊ शकतो. या बंधाºयामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊन हा परिसर हिरवागार होऊ शकतो. सर्व खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन योजना राबवून हा प्रश्न मार्गी लावता येईल. त्यामुळे येथे बंधारा बांधण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.नागनाथ येथे बंधारा झाल्यास या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. येथील शेती हिरवीगार होऊन शेतकºयांना दुबार पिके घेता येतील. त्याचबरोबर शेतकरी भाजीपाला, फुलशेती, फळशेतीही करू शकतील. त्याचबरोबर आजूबाजूच्या वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. पाण्याच्या पातळीत वाढ होईल. कुपनलिका, विहिरीचे पाणीही वाढण्यास मदत होईल.सुरेश पवार यांचे २००३ पासून प्रयत्न सुरूराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व खानिवली गावचे माजी सरपंच सुरेश पवार हे नागनाथ येथे बंधारा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. २००३ पासून ते शासन दरबारी पत्रव्यवहार करीत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष स्व.बबनराव पाटील व कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपाध्यक्ष गोटीराम पवार यांनी नागनाथ येथे शासकीय दौरा केला होता. यावेळी त्यांनीही या बंधाºयामुळे शेती हिरवीगार होईल, असा आशावाद व्यक्त केला होता.चांगल्या बंधाºयांची गरज : तालुक्यातील शेतकºयांचा विकास करायचा असेल तर येथील सर्व नद्यांवर १० किलोमीटर अंतरावर गळती न होणारे चांगले बंधारे बांधले पाहिजेत. या बंधाºयांच्या पाण्यावर परिसरातील सर्व खेड्यांमध्ये उपसा जलसिंचन योजना राबवून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली पाहिजे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.लाभक्षेत्रात येणारीगावे व जमिनीचे क्षेत्रआंबिस्ते खुर्द २२९ हेक्टरआंबिस्ते बु. ५८९ हेक्टरखानिवली १८९ हेक्टरआब्जे ३६६ हेक्टरवैतरणा नगर २७२ हेक्टरनिचोळे २७३ हेक्टरभावेघर १८३ हेक्टरया बंधाºयाच्या कामाच्या सर्वेक्षणाचे काम याच वर्षी करण्यात आले आहे. नाशिक जलसंधारण विभागाकडून पाणी साठ्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले की हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविणार आहोत.- ए.बी.फुंदे, जलसंधारण विभाग, ठाणेबिलोशी, वसुरी, खरीवली, पालसई, खुपरी, बिलावली, देवघर, गौरापूर, बोरांडा, घोडमाळ, पिंपळास, चनेमान, खरीवली, टकली, मांडा, भोपीवली, आपटी, देवळी या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल.नागनाथ येथे श्री कालभैरव व श्री शंकराचे देवस्थान आहे. या देवस्थानची सुमारे ३५० एकर जमीन आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तर दररोज शेकडो भक्तगण येथे येत असतात.कमी खर्चात जास्त गावांना फायदानागनाथ येथे बंधारा बांधून हे पाणी वसुरी येथील नाल्यात सोडल्यास सुमारे दहा ते पंधरा कि.मी. अंतरावर या पाण्याचा फायदा शेतकºयांना होईल. त्यासाठी कालवा काढण्याची गरज पडणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी संयुक्त पाणी योजना राबवल्यास त्याचा लाभ पंचवीसहून अधिक गावांना होऊ शकतो. हेच पाणी उद्योजकांनाही देणे शक्य असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार