शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

उपवन संरक्षकांच्या विरोधात आंदोलन, आदिवासींना केला शेती करण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:39 AM

वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे.

जव्हार : जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनी वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींवर गुन्हे दाखल करून जंगलात फिरण्यास मनाई केली आहे. तर वन प्लॉटधारकांची शेतावरील घरे उद्ध्वस्त करून त्यांना बुजणी, राबणी व शेती करण्यास मनाई केली आहे. म्हणून श्रमजीवी संघटनेने आवाज उठवीत उपवन संरक्षक यांच्या वनविभागाच्या दालनात एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे.त्यांनी वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे. येथील वन प्लॉटधारक आदिवासी कुटुंबेही गेल्या अनेक वर्षांपासून जंगलातील गावठी भाज्या, फळभाज्या, डिंक याचे उत्पादन घेत होते त्यावर बंदी घातली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून वन प्लॉट असलेल्या झोपडीवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. त्यामुळे येथील जंगलातील आदिवासी कुटुंब भेदरली आहेत. त्यामुळे वनपन संरक्षकांच्या दालनात श्रमजीविच्या नेतृवाखाली धरणे धरण्यात आली.पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी व डोंगराळ भाग आहे. येथील शेकडो आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी असे रोजगाराचे कुठलेही साधन नाही. तर शासनातर्फे वर्षभर रोजगार हमीचं कामही मिळत नाही. जे काही रोजगार हमीचे काम मिळते ते फक्त उन्हाळ्यात. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना रोजगारासाठी वन प्लॉटवर अवलंबून राहावे लागते. मात्र वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनी वन विभागाचे नियम अटींचा बडगा उगारला आहे.वनखात्याची दंडेलीवन विभागाने मोजणी करून दिलेल्या वन प्लॉटात झाडांची लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यास सुरवात केली आहे. तर आदिवासी हे जंगल नाश करणारे आहेत. असे समजून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आदिवासींनी श्रमजीविचा आधारघेत बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन केले.

टॅग्स :palgharपालघर