शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीमध्ये रिलायन्स विरोधात मनसेचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:52 IST

तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे.

ठळक मुद्देतलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता.

तलासरी - तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही ना रिलायन्स ना शासनाचे अधिकारी दाद देत त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तलासरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. शुक्रवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता. त्यामुळेच महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रुपये मिळत आहेत. तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्यासाठी संपादित जमिनीला 59 हजार रुपये असा अल्प मोबदला दिला जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मोबदल्यातील तफावतीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या.  राजकारण्यांचे दरवाजे झिजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावली व शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केले.

जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला व रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तलासरीजवळ दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी शासनाच्या वतीने तलासरीचे नायब तहसीलदार नरेंद्र माने यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको माघे घेण्यात आला. शासनाला व रिलायन्सला इशारा दे यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. मात्र दखल न घेतल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन् ची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे. मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून पेटवले. पण पोलिसांनी तात्काळ ते दूर केले यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. 

 

टॅग्स :palgharपालघरMNSमनसे