शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीमध्ये रिलायन्स विरोधात मनसेचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:52 IST

तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे.

ठळक मुद्देतलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता.

तलासरी - तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही ना रिलायन्स ना शासनाचे अधिकारी दाद देत त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तलासरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. शुक्रवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता. त्यामुळेच महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रुपये मिळत आहेत. तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्यासाठी संपादित जमिनीला 59 हजार रुपये असा अल्प मोबदला दिला जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मोबदल्यातील तफावतीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या.  राजकारण्यांचे दरवाजे झिजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावली व शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केले.

जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला व रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तलासरीजवळ दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी शासनाच्या वतीने तलासरीचे नायब तहसीलदार नरेंद्र माने यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको माघे घेण्यात आला. शासनाला व रिलायन्सला इशारा दे यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. मात्र दखल न घेतल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन् ची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे. मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून पेटवले. पण पोलिसांनी तात्काळ ते दूर केले यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. 

 

टॅग्स :palgharपालघरMNSमनसे