शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

वाहतूककोंडीची ‘दिशाभूल’

By admin | Updated: January 28, 2017 02:30 IST

पालघर-बोईसर रस्त्या दरम्यान उमरोळी-पंचाळी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली गुरु चरण ची पर्यायी जागा देण्यात येईल

पालघर : पालघर-बोईसर रस्त्या दरम्यान उमरोळी-पंचाळी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली गुरु चरण ची पर्यायी जागा देण्यात येईल असे सांगून लोकांची दिशाभूल केली जात असल्याची बाब समोर आली आहे. यासाठी जी पर्यायी जागा सुचिवली जात आहे ती महसूल विभागाच्या अखत्यारीतील असून प्रांतांच्या परवानगीने गावठाण विस्तार मंजूर न करताच रस्त्यासाठी देण्यात येणाऱ्या जागाच्या मोबदल्यात दीड गुंठे गावठाण जमीन देण्याच्या तोंडी आश्वासनाला कुठलाही कायदेशीर आधार नसल्याचे समोर आल्याने भविष्यात लोकांची फसगत होण्याची शक्यता आहे.पालघर बोईसर दरम्यानच्या उमरोळी पंचाळी गावात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रास्तरु ंदी करणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून ७ मिटर रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात येऊन रस्त्यांच्या दोन्हीचा बाजूला गटारे उभारण्यात येणार आहेत. २ कोटी २५ लाख किमतीचे हे काम असून या कामाचा ठेका मा. वैष्णव देवी इंटरप्रायजेस चे मालक व उमरोळी चे सरपंच प्रभाकर पाटील ह्यांना देण्यात आला आहे. या रस्त्यांचे कामे करताना रस्त्यालगत असणारी घरे, बांधकामे तोडण्यात येत असून ह्या नुकसानीच्या पोटी लोकांना गुरूचरण जमिनीतून प्रत्येकी दीड गुंठे जागा देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने लोकांना देण्यात आल्याचे स्थानिक सांगत आहेत. मात्र कायदेशीर रित्या महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेली ही जमिन ग्रामपंचायत कोणत्या कायद्याच्या आधारे बाधितांना देत आहे? हा प्रश्न बाधिता कडून उपस्थित केला जात आहे. ह्या उलट ग्रामपंचायत मात्र तुम्हाला दीड गुंठे जागा देऊ त्यावर तुम्ही घरे बांधा,ग्रामपंचायत तुम्हाला घरपट्टी लावून देईल. असे सांगत आहे. मात्र महसूल खात्याच्या अखत्यारीतील ही जमीन अशा प्रकारे भूखंड पाडून संबंधितांना द्यायची असल्यास महसूल विभागा कडून कायदेशीर गावठाण विस्तार मंजूर करून घेणे आवश्यक आहे, अशी कोणतीही प्रक्रि या न करताच भूखंडाचे आमिष दाखिवले जात असल्याने बाधितांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)