शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने मिळणार पाणी - प्रताप सरनाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:15 IST

मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे.

मीरारोड- मीरा भाईंदरच्या जनतेच्या पाणी टंचाईवर प्रमुख तोडगा असलेल्या सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेतील अडथळा ठरलेल्या कमी वीज पुरवठा आणि टनर्सफॉर्मर उभारणीच्या कामांना मंजुरी मिळाल्याने मार्च २०२६ पासून सूर्याचे पाणी मीरा भाईंदरकरांना मिळण्यास सुरवात होईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ह्या बाबत घेतलेल्या बैठकी नंतर सांगितले आहे. 

मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. सूर्या धरण योजनेतून पाणी पुरवठा सुरु होण्याची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा आहे. सुर्या उपसा जलयोजना टप्पा–२ मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा तसेच कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात ह्या बाबत बैठक घेतली. बैठकीस मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल नांदुरकर, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चेतन बेंबाळे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अजय आठवले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संदिप नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांसोबत विस्तृत चर्चा झाली. सुर्या जलयोजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी सध्याचा ३३ केव्ही वीजपुरवठा अपुरा आहे. आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्याने पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत आहे. त्यावर महापारेषणने सुर्या जलयोजनेसाठी १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे. हा वीजपुरवठा दिवा मार्गे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १३२ केव्ही पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे. या नव्या वीजपुरवठ्यामुळे पंपांची कार्यक्षमता १००% होईल, योजनेंतील २१८ लाख लिटर दशलक्ष लिटर पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल, नव्या पारेषण लाईन व ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगाने सुरू असून, सर्व कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

तर योजनेची उर्वरित कामे देखील मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा–भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजांस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदरWaterपाणी