शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने मिळणार पाणी - प्रताप सरनाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:15 IST

मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे.

मीरारोड- मीरा भाईंदरच्या जनतेच्या पाणी टंचाईवर प्रमुख तोडगा असलेल्या सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेतील अडथळा ठरलेल्या कमी वीज पुरवठा आणि टनर्सफॉर्मर उभारणीच्या कामांना मंजुरी मिळाल्याने मार्च २०२६ पासून सूर्याचे पाणी मीरा भाईंदरकरांना मिळण्यास सुरवात होईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ह्या बाबत घेतलेल्या बैठकी नंतर सांगितले आहे. 

मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. सूर्या धरण योजनेतून पाणी पुरवठा सुरु होण्याची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा आहे. सुर्या उपसा जलयोजना टप्पा–२ मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा तसेच कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात ह्या बाबत बैठक घेतली. बैठकीस मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल नांदुरकर, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चेतन बेंबाळे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अजय आठवले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संदिप नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांसोबत विस्तृत चर्चा झाली. सुर्या जलयोजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी सध्याचा ३३ केव्ही वीजपुरवठा अपुरा आहे. आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्याने पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत आहे. त्यावर महापारेषणने सुर्या जलयोजनेसाठी १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे. हा वीजपुरवठा दिवा मार्गे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १३२ केव्ही पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे. या नव्या वीजपुरवठ्यामुळे पंपांची कार्यक्षमता १००% होईल, योजनेंतील २१८ लाख लिटर दशलक्ष लिटर पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल, नव्या पारेषण लाईन व ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगाने सुरू असून, सर्व कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

तर योजनेची उर्वरित कामे देखील मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा–भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजांस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदरWaterपाणी