शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

उत्तर कोकणात आंब्याचा हंगाम यंदा मे अखेरीस? खराब हवामानाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 6:26 AM

बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे.डहाणू तालुक्यात ६१७.३२ हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. या मध्ये समुद्रकिनाऱ्यालगतचे आणि डोंगरी भागातील बागायती असे दोन प्रकार पाहावयास मिळतात. एकाच भौगोलिक क्षेत्रात माती आणि हवेतील क्षारता या मुळे चवीत थोडा फार फरक असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. रायवळ, राजापुरी, तोतापूरी अशा अन्य जातींसह पिकलेल्या आंब्याच्या विक्र ीकरिता केशर आणि हापूसची लागवड दिसून येते. त्या पैकी बोर्डी परिसरातील काही प्रगतीशील शेतकºयांनी रत्नागिरी येथून तीन ते चार वर्षांची हापूस आंब्याची कलमे आणून त्याची लागवड बागायतीत केली आहे. व्यापारी उद्दिष्टाने लागवड केलेल्या हापूस आंब्याची निर्यात मलेशियासह अन्य देशात केली जाते. मात्र आजही हा व्यवहार एजंट मार्फत होत असल्याने उत्पादकांना आर्थिक झळ सोसावीच लागते.दरम्यान डिसेंबर महिन्यात झालेले ओखी वादळ आणि त्यानंतरच्या काळात ढगाळ वातावरणामुळे पालघर जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन या वर्षी १० ते १५ टक्केच शिल्लक आहे. फळांचा आकार लहान असून रंग अपेक्षेप्रमाणे नाही. त्या मध्ये बरीचशी फळं डागाळलेली आहेत. विशेषत: ही फळं पिकण्याचा हंगाम मे अखेरीस असेल. त्यामुळे पावसाच्या संपर्कात येऊन नासधूस होणार असल्याची खंत बागायतदारांनी व्यक्त केली आहे.करंड्या, बॉक्स यांनाही फटकाबोर्डी परिसरात आंब्याची निर्यात करण्यासाठी बांबूपासून बनविलेल्या टोपल्या (करंडे) आणि हल्ली पुठ्याचे बॉक्स यांचा वापर केला जातो. त्या मध्ये करंज झाडाची पाने ठेवली जातात. त्या मुळे फळे पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया होऊन त्याला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. भाताच्या पावळीचा वापरही केला जातो. मात्र उत्पादन नसल्याने बांबूच्या टोपाल्यांची मागणी घटल्याने बुरूड व्यवसाय करणाºया महिला व्यवसायिकांना झळ पोहचणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी फळे पॅकेजिंगचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. मात्र नैसर्गिक आपत्तीने स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम केला आहे.हवामानातील बदलाने या वर्षी आंबा पीक वाया गेले आहे. फळांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. साधारणत: एप्रिल मध्यानंतर तयार हापूस आंबा मलेशियात निर्यात केला जातो. मात्र या वर्षी मागणी असूनही उत्पादन नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.- यज्ञेश सावे, कृषीभूषण

टॅग्स :Mangoआंबाkonkanकोकण