शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील खेड्यापाड्यात महावितरणचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:53 IST

डायमेकिंग व्यवसायावर परिणाम : खा. गावितांच्या आश्वासनाचे काय झाले?

शौकत शेख

डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील सुमारे ६० गावे, खेड्यापाड्यात काळोख पसरला आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात दिवस-रात्र वीजेच्या तारा तुटणे, ट्रान्स्फॉर्मर फेल होणे, अर्ध्या-अर्ध्या तासाने फ्यूज, डिओ, झंपर उडत असल्याने तासभर देखील वीजपुरवठा सुरळीत रहात नाही. परिणामी, वीजेवर अवलंबून असलेले आणि या भागात घरोघरी चालणारे लघु उद्योग, डायमेकिंग व्यवसाय धोक्यात आले आहेत. चार महिन्यांपासून चिंचणी, वरोर, वानगाव फिडर तसेच बोईसर येथील १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने वीजेची अव्वाच्या सवा बिले पाठवून सक्तीने वसूल करणाºया वीज महावितरण कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप आहे.

डहाणूच्या सुमद्र किनाºयावर वसलेल्या गाव-पाड्यात दिवसातून चार तास वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. तर रात्रीच्या सुमारास वाºयाची झुळूक आली तरी विजेच्या तारा तुटून पडतात. ग्रामस्थ एकत्र येऊन वायरमनला शोधून आणतात, आणि मग दोन - तीन तासांनी वीजपुरवठा सुरू होतो. परंतु रात्रभर डिओ, फ्यूज उडण्याचे सत्र सुरूच असते, विशेष म्हणजे फ्यूज किंवा डिओ टाकण्याचे काम येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून स्वत:च करीत असतात. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात १९६४ मध्ये वीजपुरवठा सुरू झाला. परंतु गेल्या ५५ वर्षात या परिसरात काहीच खास बदल झालेला नाही. जीर्ण, जुनाट विद्युत खांब कमकुवत क्षमतेचा जनित्र, गंजलेल्या विद्युत तारा, गावातील उकिरड्यावर लटकलेले फ्यूज बॉक्स तसेच लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीवरच महावितरण दिवस ढकलत आहे. गेल्या अनेक वर्षात या भागात सातत्याने मोर्चे, आंदोलन करून देखील महावितरण प्रशासन काही सुधारणा करीत नाही.प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीमे २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले खासदार राजेंद्र गावीत यांनी चिंचाणी येथील एका सभेत या परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन ते चार कोटींचा निधी खर्च करून सुधारणा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु अद्याप कोणतीच हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.डहाणू पश्चिम किनारपट्टीवरील गावात काही ठिकाणी महावितरणची कामे सुरू आहेत. तर अनेक गावातील सुधारणा करण्यासाठी आम्ही पालघर जिल्हा नियोजन समितीकडे काही प्रस्ताव पाठविले आहेत. निश्चितच सुधारणा होऊन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.-प्रताप मचिये,कार्यकारी अभियंता, पालघर महावितरण कंपनी

टॅग्स :dahanu-acदहनूVasai Virarवसई विरार