शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

Vidhan Sabha 2019: बोईसरमध्ये शिवसेनेला भाजपचा कडवा विरोध, काम न करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:33 IST

बहुजन विकास आघाडीला धक्का देत त्यांचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना पक्षात घेणाऱ्या शिवसेनेसमोर मित्र पक्ष असलेल्या भाजपचेच आव्हान उभे ठाकले आहे.

- पंकज राऊतबोईसर - बहुजन विकास आघाडीला धक्का देत त्यांचे बोईसरचे आमदार विलास तरे यांना पक्षात घेणाऱ्या शिवसेनेसमोर मित्र पक्ष असलेल्या भाजपचेच आव्हान उभे ठाकले आहे. या मतदारसंघावर दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेला ही जागा सोडण्यास ठाम विरोध केला आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयापर्यंत हा विषय त्यांनी पोहोचवला असून त्यानंतरही ही जागा शिवसेनेला सोडली, तर त्या उमेदवाराचे काम न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.पालघर लोकसभा मतदारसंघापाठोपाठ बोईसर विधानसभेची जागा युतीत शिवसेनेला दिल्यास जिल्ह्यात काँग्रेसला मुक्त करता- करता भाजपलाही मुक्त करु नका, असा इशारा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदेश नेत्यांना दिला आहे. भाजपच्या प्रदेश चिटणीस अर्चना वाणी यांच्यासह बोईसर विधानसभा मंडळाचे महावीर जैन, प्रमोद आरेकर, राधेश्याम चौधरी आणि सुनील केणी या चार अध्यक्ष आणि बोईसर विधानसभा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र देत या मतदारसंघावर दावा केला. तसेच संघटनमंत्री विजय पुराणिक आणि मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली.भाजपची स्थिती कशी?२०१४ मध्ये बोईसर विधानसभा निवडणुकीत भाजपचे जगदीश जोडी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना ३०,२८८ (१७.६५ टक्के) इतकी मते मिळाली. ते तिसºया क्र मांकावर होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांना ५१,६७७ (३०.१७ टक्के) इतकी दुसºया क्र मांकाची मते मिळाली होती. याच निवडणुकीमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुनील धानवा अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांना ५,७०२ (३.३३ टक्के) अशी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या निवडणुकीत बविआचे विलास तरे ६५,५५० मते मिळवून १२ हजार ८७३ च्या मताधिक्याने निवडून आले.सध्याचे चित्र काय?जिल्ह्यातील डहाणू व विक्र मगड हे दोन मतदारसंघ भाजपला आणि उरलेले चार मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २००९ व २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे विलास तरे यांनी बोईसरमध्ये विजय मिळविला होता. तर या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती.भाजपचे इच्छूक उमेदवार संतोष जनाठे काही वर्षांपासून बोईसर विधानसभा मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. भाजपाला बोईसरची जागा मिळाली, नाही तर अन्याय होईल.- महावीर जैन, अध्यक्ष,बोईसर विधानसभा मंडळ.भाजपची बोईसरमधील संघटनात्मक ताकद वाढली असून आम्हाला ही जागा मिळावी, हा आमचा आग्रह आहे. आमचा पक्ष संस्कारावर चालणारा आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठांचे आदेश पाळू. आम्हाला ही जागा मिळेल, अशी आशा आहे.- अर्चना वाणी, भाजप प्रदेश चिटणीस. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vasai Virarवसई विरार