शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

Maharashtra Election 2019: वसईत शहरी, ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 1:24 AM

Maharashtra Election 2019: मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला.

वसई : मतदानाच्या दिवशी पावसाने नेमकी उसंत घेतल्याने वसई मतदारसंघात सकाळपासूनच मतदारराजांचा उत्साह पहायला मिळाला. दोन-दोन तासांनी तसेच दुपारनंतर वसईच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदार बाहेर पडू लागल्याने मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढत गेली.येथे प्रामुख्याने बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि शिवसेनेचे विजय पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.

सकाळच्या वेळी चुळणे भागात ९.३० च्या सुमारास साधारण तासभर तरी वीज खंडित होण्याचा प्रकार घडला होता, मात्र नंतरच्या काळात कुठेही मतदानकेंद्रावर तांत्रिक अथवा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बोगस मतदान किंवा तुरळक मारामारी असे प्रकार वसई आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले नसून सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे वसई आणि माणिकपूर पोलीस निरीक्षक पुकळे आणि राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ५८ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती वसई विधानसभेचे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किरण सुरवसे यांनी लोकमतला दिली. सकाळी पहिल्या टप्प्यात दोन तासात ८.३३ टक्के मतदान झाले. तर दुपारी १ वाजेपर्यंत हाच आकडा ३६.५१ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर टक्केवारी वाढत गेली आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान