शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:03 IST

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. यापूर्वी विरोध दर्शवून काही कालावधीत निर्णय बदलून नगरपरिषदेने सिडकोपुढे लोटांगण घातल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.पालघर जिल्ह्याचे मुख्यालय सिडकोच्या माध्यमातून कोळगाव येथे उभारले जात असून त्यासाठी सिडकोने नगरपरिषदेच्या २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या कोट्यातील २ दलघमी इतक्‍या पाण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यास कमतरता भासत असल्याचे सांगत नगरपरिषदेने त्यांची मागणी यापूर्वी फेटाळली होती. त्याच वेळी सूर्या प्रकल्पांतर्गत पाण्याची उपलब्धताही नेहमी राहत नसल्याने सिडकोची मागणी जलसंपदा विभागाने अमान्य केली होती. त्यामुळे नगरपरिषदेने पाणी देऊ नये असा ठराव एकमताने घेण्यात आला असताना आता अचानक नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घुमजाव करीत पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे राजकीय दबावामुळे घडले की अंतर्गत बाबीवर निर्णय झाला याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.या निर्णयाला भाजपच्या विरोधी पक्ष गटनेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनाच पुरेसे पाणी मिळत नसताना सिडकोसाठी एवढे उदार होण्याची भूमिका नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे व त्यांच्या टीमने का घेतली? याचे उत्तर पालघरवासीयांना द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे. नगरपरिषदेने पाणी देण्याचे मान्य केल्याने त्यांना आता प्रतिदिन पाच लाख लीटर पाणी द्यावे लागणार असून पालघर नगरपरिषद क्षेत्रात नागरीकरण वाढत असताना त्यांच्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन काय, याचे कुठलेही उत्तर सध्या नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे पालघरकरांवर आणि अन्य २० गावांवर पाण्याच्या दुर्भीक्ष्यतेचे संकट ओढवू शकते.जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने त्यांना नियमानुसार पाणी द्यावे लागते.- डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षानगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची पाळी उद्भवू शकते.- भावानंद संखे, भाजप विरोधी पक्षनेतेनगरपरिषद क्षेत्रासह अन्य २० गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसताना मुख्यालयाला पाणी देणे कितपत योग्य आहे?      - संतोष चुरी, नागरिक, पालघर 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार