शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:03 IST

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. यापूर्वी विरोध दर्शवून काही कालावधीत निर्णय बदलून नगरपरिषदेने सिडकोपुढे लोटांगण घातल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.पालघर जिल्ह्याचे मुख्यालय सिडकोच्या माध्यमातून कोळगाव येथे उभारले जात असून त्यासाठी सिडकोने नगरपरिषदेच्या २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या कोट्यातील २ दलघमी इतक्‍या पाण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यास कमतरता भासत असल्याचे सांगत नगरपरिषदेने त्यांची मागणी यापूर्वी फेटाळली होती. त्याच वेळी सूर्या प्रकल्पांतर्गत पाण्याची उपलब्धताही नेहमी राहत नसल्याने सिडकोची मागणी जलसंपदा विभागाने अमान्य केली होती. त्यामुळे नगरपरिषदेने पाणी देऊ नये असा ठराव एकमताने घेण्यात आला असताना आता अचानक नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घुमजाव करीत पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे राजकीय दबावामुळे घडले की अंतर्गत बाबीवर निर्णय झाला याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.या निर्णयाला भाजपच्या विरोधी पक्ष गटनेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनाच पुरेसे पाणी मिळत नसताना सिडकोसाठी एवढे उदार होण्याची भूमिका नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे व त्यांच्या टीमने का घेतली? याचे उत्तर पालघरवासीयांना द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे. नगरपरिषदेने पाणी देण्याचे मान्य केल्याने त्यांना आता प्रतिदिन पाच लाख लीटर पाणी द्यावे लागणार असून पालघर नगरपरिषद क्षेत्रात नागरीकरण वाढत असताना त्यांच्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन काय, याचे कुठलेही उत्तर सध्या नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे पालघरकरांवर आणि अन्य २० गावांवर पाण्याच्या दुर्भीक्ष्यतेचे संकट ओढवू शकते.जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने त्यांना नियमानुसार पाणी द्यावे लागते.- डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षानगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची पाळी उद्भवू शकते.- भावानंद संखे, भाजप विरोधी पक्षनेतेनगरपरिषद क्षेत्रासह अन्य २० गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसताना मुख्यालयाला पाणी देणे कितपत योग्य आहे?      - संतोष चुरी, नागरिक, पालघर 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार