शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:03 IST

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. यापूर्वी विरोध दर्शवून काही कालावधीत निर्णय बदलून नगरपरिषदेने सिडकोपुढे लोटांगण घातल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.पालघर जिल्ह्याचे मुख्यालय सिडकोच्या माध्यमातून कोळगाव येथे उभारले जात असून त्यासाठी सिडकोने नगरपरिषदेच्या २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या कोट्यातील २ दलघमी इतक्‍या पाण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यास कमतरता भासत असल्याचे सांगत नगरपरिषदेने त्यांची मागणी यापूर्वी फेटाळली होती. त्याच वेळी सूर्या प्रकल्पांतर्गत पाण्याची उपलब्धताही नेहमी राहत नसल्याने सिडकोची मागणी जलसंपदा विभागाने अमान्य केली होती. त्यामुळे नगरपरिषदेने पाणी देऊ नये असा ठराव एकमताने घेण्यात आला असताना आता अचानक नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घुमजाव करीत पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे राजकीय दबावामुळे घडले की अंतर्गत बाबीवर निर्णय झाला याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.या निर्णयाला भाजपच्या विरोधी पक्ष गटनेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनाच पुरेसे पाणी मिळत नसताना सिडकोसाठी एवढे उदार होण्याची भूमिका नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे व त्यांच्या टीमने का घेतली? याचे उत्तर पालघरवासीयांना द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे. नगरपरिषदेने पाणी देण्याचे मान्य केल्याने त्यांना आता प्रतिदिन पाच लाख लीटर पाणी द्यावे लागणार असून पालघर नगरपरिषद क्षेत्रात नागरीकरण वाढत असताना त्यांच्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन काय, याचे कुठलेही उत्तर सध्या नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे पालघरकरांवर आणि अन्य २० गावांवर पाण्याच्या दुर्भीक्ष्यतेचे संकट ओढवू शकते.जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने त्यांना नियमानुसार पाणी द्यावे लागते.- डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षानगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची पाळी उद्भवू शकते.- भावानंद संखे, भाजप विरोधी पक्षनेतेनगरपरिषद क्षेत्रासह अन्य २० गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसताना मुख्यालयाला पाणी देणे कितपत योग्य आहे?      - संतोष चुरी, नागरिक, पालघर 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार