शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

व्यवसाय करायचा तर आता परवाना होणार बंधनकारक    

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 11:55 PM

Vasai-Virar Municipal Corporation : पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे.

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गत ज्या दुकानदारांना, व्यावसायिकांना व्यवसाय करायचा असेल तर मनपाचा ना हरकत परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. किमान दीड हजारांपासून हा व्यवसाय कर मनपा आकारणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून हे परवाने देण्यास सुरुवात केेली जाणार असल्याने पालिकेच्या तिजोरीत दरवर्षाला ७० ते ७५ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे. वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. मात्र तेव्हापासून शहरातील व्यावसायिक आणि दुकानदार पालिकेला कर न देता व्यवसाय करत होते. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने विविध स्रोतांचा अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी दुकानदारांकडून मालमत्ता कर वगळता कुठलाही कर आकारला जात नसल्याचे लक्षात आले. यामुळे पालिकेने सर्व दुकानदारांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यवसाय परवाना काढावा लागणार आहे. ज्यांची कायमस्वरूपी दुकाने आहेत, त्यांना व्यवसाय परवाना काढावा लागणार आहेच. शिवाय जे तात्पुरता व्यवसाय करतील त्यांनाही परवाना काढावा लागणार आहे. शहरात चित्रीकरण केले जाते. तसेच सर्कस, मेळावे, व्यापारपेठेचे आयोजन केले जाते. या सर्वांना हा परवाना बंधनकारक होणार आहे. चित्रीकरणाला कर लागू झाल्याने पालिकेला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 

कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर ना हरकत परवाना घ्यावा लागतो. पण वसई-विरार महानगरपालिकेत याकडे दुर्लक्ष केले होते. नियमांप्रमाणे ना हरकत दाखल्याला लागणारी फी आकारली जाणार आहे. परवाना नूतनीकरणासाठी फी आकारली जाणार आहे. महानगरपालिकेकडे ना हरकत परवान्यामुळे दरवर्षी ७० ते ७५ कोटींची रेव्हेन्यूमध्ये भर पडणार आहे.- प्रदीप जांभळे-पाटील,     उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका

लोकांच्या सुविधेसाठी सोपी पद्धतपरवाना मिळावा म्हणून चालू वर्षाची घरपट्टी, दुकानाचे ॲग्रिमेंट, भाडेकरार, ओळखपत्राच्या साहाय्याने फॉर्म स्वतः कार्यालयात जाऊन भरु शकतात किंवा ऑनलाइन व महानगरपालिकेच्या वेबसाइटवरसुद्धा परवान्यासाठी अर्ज करू शकता. छोट्या दुकानदारांना, उद्योगधंद्यांना महानगरपालिकेचा परवाना मिळावा यासाठी सोपी पद्धत ठेवण्यात आली असल्याचे मनपा उपायुक्तांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

अंमलबजावणीला सुरुवातnमहानगरपालिका क्षेत्रातील दुकानदार आणि व्यावसायिकांकडून लगेचच परवाना शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७६, ३७६ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्याच्या कामाला नऊ प्रभागात सुरुवात केली आहे. nजागोजागी बॅनर, वर्तमानपत्रात जाहिराती, वेबसाइटवर ना हरकत दाखल्यासंबंधी महानगरपालिकेकडून आव्हान केले जात आहे. १५ दिवसांत ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करावा लागेल. जे याकडे कानाडोळा करून व्यवसाय सुरू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दुकानांना सील केले जाईल.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार