शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

विणी हंगामात पालघरच्या किनाऱ्याकडे कासवांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:50 IST

कासवमित्रांचा आरोप : वाढती रेतीचोरी, बकाल चौपाट्या ठरतात कारणीभूत

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : दक्षिण कोकणाच्या किनाºयावर समुद्री कासवांच्या विणी हंगामाला प्रारंभ झाला आहे. मात्र, उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात एकाही कासवाने अंडी दिल्याची घटना मागील दहा-पंधरा वर्षात आढळलेली नाही. वाढती रेतीचोरी, समुद्रातील सर्व्हेक्षणातून वाढते रेडिएशन, उच्चतम भरतीरेषेनजीक अतिक्र मणं आणि पर्यटनाच्या नावाखाली मानवी हस्तक्षेपामुळे कासवांनी येथे पाठ फिरवल्याचा मुद्दा कासवमित्रांनी उपस्थित केला आहे.

पालघर जिल्ह्याला सव्वाशे किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून त्यामध्ये डहाणू तालुक्यातील ३५ किमीचा समावेश आहे. येथे आॅलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉन्गरहेड आणि हॉक्सबिल या चार जातींची कासवं आढळतात. एकीकडे दक्षिण कोकणातील किनाºयावर येऊन कासवांनी अंडी देण्यास सुरु वात केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात साधारणत: २००४ सालापासून कासवांनी अंडी दिल्याची घटना ऐकिवात नसल्याची माहिती कासविमत्रांनी दिली.

समुद्रात विविध कारणांनी वाढत्या सर्व्हेक्षणामुळे निर्माण होणारे रेडिएशन, पर्यटनाच्या नावाखाली वाढलेला अति मानवी हस्तक्षेप, सुशोभीकरणाकरिता लावलेले विजेचे दिवे, करमणुकीकरिता लावलेले साहित्य, बैठक व्यवस्था निर्माण केल्याने रात्री उशिरापर्यंत माणसांचा वावर, पर्यटनाच्या नावाखाली भौतिक सुविधा व धांगडधिंगा, ओहटीवेळी थेट समुद्रात वाहनं उतरवून होणारी रेतीचोरी, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. तर १९९१ साली डहाणू पर्यावरण प्राधिकारणाची स्थापना झाल्यानंतर हा तालुका पर्यावरणदष्ट््या अतिसंवेदनशील घोषित झाला. त्यामुळे किनाºयालगत बांधकामांवर मर्यादा आहे. मात्र, पाणथळ जागा तसेच खाजण क्षेत्रावरही भराव घालून काँक्र ीडीकरणाचे झपाट्याने वाढते जंगल हा धोका आहे. ही पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नाही.

डहाणू पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त माजी न्यायाधीश अँड. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे तर रक्षणकर्ताच हरपल्याची स्थानिकांची भावना आहे. अपप्रवृत्तीविरु द्ध आवाज उठविणाºयांची प्रशासनाकडून गळचेपी केली जात असल्याचा आरोपही होत आहे. दरवर्षी पन्नास पेक्षा अधिक जखमी कासवं पारनाका येथील वन विभागाच्या आवारात उभारलेल्या देशातील एकमेव सुश्रुषा केंद्रात आणली जातात. वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या संस्थेचे सदस्य त्याकरिता दिवसरात्र झटतात. या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यास, या भागात कासवं पुन्हा अंडी घालण्यास येऊन हे नंदनवन पुन्हा बहरेल अशी आशा व्यक्त होत आहे.अतिहस्तक्षेपाने कासवांची पाठझाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, आगर, सतीपाडा, डहाणू गाव ते थेट वाढवण, चिंचणीपर्यंतच्या किनाºयावर कासवांची मादी अंडी द्यायला यायची. किनाºयालगतचे वाळूचे साठे, रेताडजमीन, केवड्याचे बन हे क्षेत्र निवडले जायचे. खडयात अंडी घातल्यानंतर मर्यादावेल तसेच अन्य वनस्पतीने हा भाग आच्छादित केला जायचा.च्मात्र मानवाच्या अति हस्तक्षेपाने कासवांनी पाठ फिरवली. किनाºयावर धूप प्रतिबंधक बंधारे आणि रचलेले दगड हा कासवांकरिता मोठा अडथळा ठरतो. किमान दशकभर मूठभर वाळूचा उपसा न झाल्यास गतवैभव प्राप्त होईल असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दहा ते पंधरा वर्षांत अंडी घातल्याची नोंद नाही : उच्चतम भरती रेषा ओलांडून कासवांची मादी अंडी घालण्यास येते. पाण्याच्या संपर्कात येऊन अंडी कुजू नयेत हे त्यामागे प्रमुख कारण आहे. मात्र मागील १० ते १५ वर्षांपासून कासवांनी अंडी दिल्याची जिल्ह्यात एकही घटना घडलेली नाही. किनाºयावर वाढलेला मानवी हस्तक्षेप, सीआरझेडचे खुलेआम उल्लंघण करून वाढलेली बांधकामं आदी अडथळा ठरणारी प्रमुख कारणं आहेत. डहाणू पर्यावरण संरक्षण हटवण्याचा घाट घातला जात आहे. शासन आणि स्थानिकांनी त्याकडे गांभीर्याने पाहणं अत्यावश्यक आहे. 

दरवर्षी जखमी कासवांची संख्या झपाट्याने वाढणं ही समुद्री पर्यावरणाला आणि कासवांच्या अिस्तत्वाला धोक्याचा निर्देश आहे. - धवल कंसारा, संस्थापक, वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार