शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विणी हंगामात पालघरच्या किनाऱ्याकडे कासवांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:50 IST

कासवमित्रांचा आरोप : वाढती रेतीचोरी, बकाल चौपाट्या ठरतात कारणीभूत

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : दक्षिण कोकणाच्या किनाºयावर समुद्री कासवांच्या विणी हंगामाला प्रारंभ झाला आहे. मात्र, उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात एकाही कासवाने अंडी दिल्याची घटना मागील दहा-पंधरा वर्षात आढळलेली नाही. वाढती रेतीचोरी, समुद्रातील सर्व्हेक्षणातून वाढते रेडिएशन, उच्चतम भरतीरेषेनजीक अतिक्र मणं आणि पर्यटनाच्या नावाखाली मानवी हस्तक्षेपामुळे कासवांनी येथे पाठ फिरवल्याचा मुद्दा कासवमित्रांनी उपस्थित केला आहे.

पालघर जिल्ह्याला सव्वाशे किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून त्यामध्ये डहाणू तालुक्यातील ३५ किमीचा समावेश आहे. येथे आॅलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉन्गरहेड आणि हॉक्सबिल या चार जातींची कासवं आढळतात. एकीकडे दक्षिण कोकणातील किनाºयावर येऊन कासवांनी अंडी देण्यास सुरु वात केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात साधारणत: २००४ सालापासून कासवांनी अंडी दिल्याची घटना ऐकिवात नसल्याची माहिती कासविमत्रांनी दिली.

समुद्रात विविध कारणांनी वाढत्या सर्व्हेक्षणामुळे निर्माण होणारे रेडिएशन, पर्यटनाच्या नावाखाली वाढलेला अति मानवी हस्तक्षेप, सुशोभीकरणाकरिता लावलेले विजेचे दिवे, करमणुकीकरिता लावलेले साहित्य, बैठक व्यवस्था निर्माण केल्याने रात्री उशिरापर्यंत माणसांचा वावर, पर्यटनाच्या नावाखाली भौतिक सुविधा व धांगडधिंगा, ओहटीवेळी थेट समुद्रात वाहनं उतरवून होणारी रेतीचोरी, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. तर १९९१ साली डहाणू पर्यावरण प्राधिकारणाची स्थापना झाल्यानंतर हा तालुका पर्यावरणदष्ट््या अतिसंवेदनशील घोषित झाला. त्यामुळे किनाºयालगत बांधकामांवर मर्यादा आहे. मात्र, पाणथळ जागा तसेच खाजण क्षेत्रावरही भराव घालून काँक्र ीडीकरणाचे झपाट्याने वाढते जंगल हा धोका आहे. ही पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नाही.

डहाणू पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त माजी न्यायाधीश अँड. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे तर रक्षणकर्ताच हरपल्याची स्थानिकांची भावना आहे. अपप्रवृत्तीविरु द्ध आवाज उठविणाºयांची प्रशासनाकडून गळचेपी केली जात असल्याचा आरोपही होत आहे. दरवर्षी पन्नास पेक्षा अधिक जखमी कासवं पारनाका येथील वन विभागाच्या आवारात उभारलेल्या देशातील एकमेव सुश्रुषा केंद्रात आणली जातात. वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या संस्थेचे सदस्य त्याकरिता दिवसरात्र झटतात. या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यास, या भागात कासवं पुन्हा अंडी घालण्यास येऊन हे नंदनवन पुन्हा बहरेल अशी आशा व्यक्त होत आहे.अतिहस्तक्षेपाने कासवांची पाठझाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, आगर, सतीपाडा, डहाणू गाव ते थेट वाढवण, चिंचणीपर्यंतच्या किनाºयावर कासवांची मादी अंडी द्यायला यायची. किनाºयालगतचे वाळूचे साठे, रेताडजमीन, केवड्याचे बन हे क्षेत्र निवडले जायचे. खडयात अंडी घातल्यानंतर मर्यादावेल तसेच अन्य वनस्पतीने हा भाग आच्छादित केला जायचा.च्मात्र मानवाच्या अति हस्तक्षेपाने कासवांनी पाठ फिरवली. किनाºयावर धूप प्रतिबंधक बंधारे आणि रचलेले दगड हा कासवांकरिता मोठा अडथळा ठरतो. किमान दशकभर मूठभर वाळूचा उपसा न झाल्यास गतवैभव प्राप्त होईल असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दहा ते पंधरा वर्षांत अंडी घातल्याची नोंद नाही : उच्चतम भरती रेषा ओलांडून कासवांची मादी अंडी घालण्यास येते. पाण्याच्या संपर्कात येऊन अंडी कुजू नयेत हे त्यामागे प्रमुख कारण आहे. मात्र मागील १० ते १५ वर्षांपासून कासवांनी अंडी दिल्याची जिल्ह्यात एकही घटना घडलेली नाही. किनाºयावर वाढलेला मानवी हस्तक्षेप, सीआरझेडचे खुलेआम उल्लंघण करून वाढलेली बांधकामं आदी अडथळा ठरणारी प्रमुख कारणं आहेत. डहाणू पर्यावरण संरक्षण हटवण्याचा घाट घातला जात आहे. शासन आणि स्थानिकांनी त्याकडे गांभीर्याने पाहणं अत्यावश्यक आहे. 

दरवर्षी जखमी कासवांची संख्या झपाट्याने वाढणं ही समुद्री पर्यावरणाला आणि कासवांच्या अिस्तत्वाला धोक्याचा निर्देश आहे. - धवल कंसारा, संस्थापक, वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार