शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रामभाऊ पाटील यांना समाजबांधवांचा अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 02:55 IST

मच्छीमारांच्या आयुष्यातील संघर्षाशी स्वत:ला समरस करुन आयुष्यभर लढणाऱ्या रामभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, रायगड आदी भागातून मच्छिमार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालघर : मच्छीमारांच्या आयुष्यातील संघर्षाशी स्वत:ला समरस करुन आयुष्यभर लढणाऱ्या रामभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, रायगड आदी भागातून मच्छिमार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात स्वातंत्र्य सैनिक जनार्दन तांबे, माजी आमदार नवनीत शहा, डॉ.विनायक उर्फ दादा परुळेकर, नॅशनल फिश फोरम चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, दिल्लीचे मच्छिमार नेते अशोक शर्मा, मच्छीमार नेत्या पूर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, राजन मेहेर, ठाणे जिल्हा संघाचे चेअरमन जयकुमार भाय, अशोक नाईक, फिलिप मस्तान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मुंबईच्या हाफिकन इन्स्टिट्यूट मध्ये आर्किटेक्ट म्हणून नोकरी करीत असतांना रामभाऊंना समुद्र खुणावत असल्याने अल्पावधीतच आपल्या नोकरीला रामराम ठोकून त्यांनी सन १९६७ साली स्वत:ची ट्रॉलर्स बोट बांधून मासेमारी व्यवसायात उडी घेतली. त्या व्यवसायात ते यशस्वी झाले नसले तरी व्यापाºयाकडून मच्छीमारांची व्यवसायात होणारी लूट रोखण्यासाठी समविचारी लोकांचा गट तयार करण्यात ते यशस्वी झाले. आणि त्यांनी आपले मासे मुंबई मार्केट मध्ये विक्रीला पाठविण्यास सुरु वात केली आणि त्यात अधिक फायदा मिळविण्यात ते यशस्वीही ठरले. या व्यवसायातील धोके, उणीवा, समस्या त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. राष्ट्रदलाशी नाळ जुळलेले रामभाऊ, आपल्या मच्छिमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मच्छिमार नेते भाई बंदरकराच्या चळवळीशी जोडले गेले. अनेक वर्षे त्यांच्या सोबत काम केल्या नंतर भाईच्या मृत्यू नंतर रामभाऊंच्या खांद्यावर महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मोठी जबाबदारी येऊन पडली. समस्त मच्छीमारांच्या आशा-आकांक्षा आपल्यावर अवलंबून आहेत ह्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे पायाला चक्रे लावल्याप्रमाणे ते देशातील किनारपट्ट्याचा भाग फिरत लोकांचे प्रश्न समजून घेऊ लागले. केंद्र शासनाने २००३ साली गेट करारानुसार विदेशी बोटींना समुद्रात मुक्त मासेमारी परवानगी दिल्याच्या घोषणेने रामभाऊ अस्वस्थ झाले.अद्ययावत सामग्रीनी युक्त अशा ह्या परदेशी बोटी आपल्या समुद्रात घुसल्यास माझा मच्छिमार बांधव पार उद्ध्वस्त होऊन जाईल हा धोका त्यांनी ओळखला. आणि जागतिक नेते थॉमस कोचेरी, आणि सहकारी सातपाटीचे आ.रा. पाटील ह्यांच्या साथीने त्यांनी कफपरेड येथे आमरण उपोषणाला सुरु वात केली. अनेक दिवस चाललेल्या उपोषणाची दखल घेत सरकारला आपला आदेश माघार घेत करार रद्द करावा लागला होता.ह्या उपोषणा नंतर त्यांच्या वरचा मच्छिमारांचा विश्वास द्विगुणित झाला. त्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसू लागला. आणि ‘काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसे काटेंगे’ अशा घोषणा शासनाच्या विरोधात देत हातात सुºयांची प्रतिकृती घेतलेल्या हजारो महिला आंदोलनात दिसू लागल्या.समुद्रात ओएनजीसीच्या तेल सर्वेक्षणा मुळे होणारे प्रदूषण, प्रतिबंधित भागामुळे कमी होणारे मासेमारी क्षेत्र,जाळ्यांचे होणारे नुकसान आदी कारणामुळे संतप्त झालेल्या हजारो मच्छीमारांनी २००५ साली मुंबईच्या ओएनजीसी कार्यालयाला दिलेल्या धडकेने तत्कालीन शासनकर्तेही नरमले होते.केंद्र शासनाने सन १९९१ साली सीआरझेड कायदा रद्द करून नव्याने एमिसझेड कायद्याचे नोटिफिकेशन काढले. हे मच्छिमारांच्या विरोधातील नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी जागतिक नेते कोचेरी ह्यांच्या खांद्याला खांदा लावून रामभाऊ,नरेंद्र पाटील आदींनी २००८ साली जक्कु, कन्याकुमारी ते कलकत्ता असा लॉंगमार्च काढला. त्यामुळे केंद्र शासनाला हे नोटिफिकेशन रद्द करावे लागले होते. मासा वाचला तरच मच्छिमार वाचेल ह्याची जाणीव आपल्या मच्छिमार बांधवांना देऊन लहान आसाच्या जाळ्यावर बंदी घालून मासेमारी दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. पारंपरिक मच्छिमारी टिकून रहावी आणि गरिबी निर्मूलन व्हावे ह्यासाठी डब्लूएफएफपीच्या माध्यमातून देशभरातील संघटनांच्या सोबतीने युरोपमध्ये त्यांनी लढे उभारले. १९८९ साली कोचेरींसोबत जीवन वाचवा, पाणी वाचवा ह्या कन्याकुमारी येथे आयोजित आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात वसई येथील कार्यकर्ता जखमी झाला होता. हे आंदोलनही यशस्वी झाले होते. शेतकºयांप्रमाणे मच्छिमार बोटीं वापरत असलेल्या डिझेल, आॅइलवर अनुदान मिळावे ही मागणी आंदोलनातून पूर्ण झाल्याने मच्छिमार बोटधारक आजही त्याचा फायदा घेत आहेत. आज वडराई सहकारी संस्थेतील स्व.मारु तीराव मेहेर व्यासपीठावर आयोजित रामभाऊंचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवला होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूमुळे मच्छिमार समाजाची न भरून येणारी हानी झाल्याच्या भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या.मच्छीमारांच्या विकासाचा,त्यांच्या उन्नतीचा सतत विचार करणारे व्यक्तिमत्व हरपले.- नवनीत शहा, माजी आमदार

संपूर्ण देशातील किनारपट्टीवर दु:खाचे सावट ओढवले असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांची अपुरी कामे पुढे नेणार.- अशोक शर्मा, मच्छिमार नेते, दिल्ली

टॅग्स :Vasai Virarवसई विरार