शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अखेरच्या दिवशी प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:28 IST

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर पूर्वीच्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन विक्रमगड हा निर्माण झालेला नविन विधानसभा मतदारसंघ आहे़ जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील कंचाड मिळुन तो तयार झालेला आहे़

विक्रमगड - मतदारसंघाच्या फेररचनेनंतर पूर्वीच्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन विक्रमगड हा निर्माण झालेला नविन विधानसभा मतदारसंघ आहे़ जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील कंचाड मिळुन तो तयार झालेला आहे़ यात ११०५१ मतदारांचा नव्याने समावेश झालेला असून २ लाख ५३ हजार १८४ (पुरुष-१२८८२५ व स्त्री-१२४५९) मतदार येत्या २८ एप्रिल रोजी होणा-या लोकसभेच्या पोट निवणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत़लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले भाजपा (राजेंद्र गावित), बहुजन विकास आघाडी (बळीराम जाधव), शिवसेना (श्रीनिवास वनगा), कॉगे्रस-राष्टÑ्वादी(दामोदर शिंगडा) आघाडी, माकप, व इतर अपक्ष मिळून ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने चुरशीची अशी पंचरंगी लढत होत आहे़ मात्र खरी लढत ही भाजपा, बहुजनविकास आघाडी व शिवसेना यांचेमध्ये अपेक्षीत आहे़. शनिवारी प्रचाराचा शेवट दिवस असल्याने प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, मोटर सायकल रॅली, तसेच मतदारांच्या घरी गल्ली-बोळातून फिरतांना दिसत आहेत़ आमच्या उमेदवारांना मतदान करा असा आग्रह धरत आहेत़ त्यामुळे सर्वच परिसर प्रचारमय झालेला दिसत होता. येथे आदिवासी समाजाचे प्राबल्य जास्त आहे़ परंतु जव्हार मोखाडा व विक्रमगड हे भाग विकासापासून दूर आहेत, असे येथील मतदार बोलून दाखवित आहेत़ त्यामुळे येथील गाव -खेडयातील काही मतदार नोटा बटनाचा वापर करू असे खाजगीत सांगत आहेत. त्यामुळे यावेळी तरी मतदान करतांना आपल्या भागाचा विकास काय केला यावर उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत़विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीपासून येथील आदिवासींच्या नावाने हजारो कोटी रुपये कागदोपत्री खर्च होतांना दिसत आहेत परंतु गेल्या ६७ वर्षात या भागाचा विकास करणारा सक्षम लोकप्रतिनिधी अर्जुन या भागात मिळालेला नसल्याची खंत येथील मतदार व्यक्त करीत आहेत़ याचा परिणाम गेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदार संघातून झालेल्या ४९ टक्के मतदानाने मतदारांनी आणून दिला आहे. प्रत्येकवेळी उभे असलेले उमेदवार तेच-तेच असल्याने मतदार कंटाळलेले आहेत़ गेल्या ६७ वर्षापासून येथील दऱ्या-खोºयातील आदिवासी त्याच हालअपेष्टांमध्ये जीवन जगत आहेत़ गावात त्यांना जगण्यासाठी रोजगार नसल्याने पावसाळा संपताच ८ महिने काम मिळेल अशा शहरांच्या ठिकाणी आपली मायभूमी सोडून स्थंलातर करीत आहेत़ तसेच रस्ते, शिक्षण, निवारा, उत्पादीत शेतमालाला हमी भाव नाही, औद्योगीक वसाहतींचा अभाव, पाणी वीज सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता याचा अभाव असलेले जीणे जगत आहेत.निकाल ३१ मे रोजी पालघर येथे ३ दिवस मतपेट्यामूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात लोकप्रतिनिधींना सपशेल अपयश आलेले आहे़ या भागात अजूनही कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले नाही़ वीज भारनियमन, दरवर्षी उदभवणारी भीषण पाणी टंचाई, बंद पडलेल्या नळ पाणी योजना या सर्व समस्यांची विकासाच्या दृष्टीने सोडवणूक व्हायला हवी व यातून बाहेर काढणारा लोक प्रतिनिधी हवा असे मतदारांचे म्हणणे आहे़ त्यामुळे हया निवडणुकीत नुसती आश्वासने देऊन चालणार नाही तर मतदारांना प्रत्यक्ष कृती हवी आहे़ तरच यापुढे लोकप्रतिनिधींचा टिकाव लागणार आहे़ आज या ०७ उमेदवारांकरीता सहा विधानसभा कार्यक्षेत्रातील १७ लाख २४ हजार ००६ मतदारापैकी पुरुष मतदार-९०३७८० व स्Þित्रया मतदार-८२०१४० व इतर ८६ मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ त्यासाठी सोमवारी २८ मे रोजी निवडणूक होत आहे़ मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला निवडणुकीचा प्रचार थांबला असून उमेदवार सोमवारी होणा-या मतदानाच्या तयारीला लागले आहेत़ पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रात सोमवारी होणा-या निवडणुकीत मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद होउन त्याचा निकाल जाणून घेण्यासाठी गुरूवारपर्यंतची प्रतिक्षा करावी लागणार आहे़

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018