शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

लॉकडाऊन काळात वाढल्या वाहनचोरीच्या घटना; वसईत ७ महिन्यांत तब्बल २१५ वाहने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:57 IST

पोलिसांपुढे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान

- मंगेश कराळेनालासोपारा : वसई तालुक्यात घरफोडी, चोरी, मारामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी आणि आॅनलाईन फसवणूक यासारखे गुन्हे नेहमी घडत आहे, मात्र वसई-विरार शहरात सध्या वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. या वर्षातील पहिल्या सात महिन्यात तब्बल २१५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी एक वाहन चोरीला जात आहे. विशेष म्हणजे यातील चाळीस वाहने ही टाळेबंदीच्या काळात चोरीला गेली आहेत. या वाहनचोरांच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आणि लोकांचे रोजगार बुडाले. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहरात घरफोड्या, भुरट्या चोºया, सोनसाखळी चोºया, मोबाईल चोºया, फसवणूक, रस्त्यात अडवून लुटणे आदी प्रकार वाढू लागले आहेत. या सर्वांमध्ये वाहनचोरीही प्रामुख्याने वाढली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात २१५ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच जीप आणि मालवाहतूक करणाºया वाहनांचाही समावेश आहे. सध्या वाहनचोरी करणारी टोळी शहरात सक्रि य झाली आहे. वाहनचोरी रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही होत आहे. घरासमोर, इमारतीखाली पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत.रस्त्याच्या कडेला असलेली वाहने राजरोसपणे लंपास केली जात आहेत. कोरोना काळात पोलिसांचे झालेले दुर्लक्ष, गस्तीचा अभाव, नागरिकांची कमी झालेली वर्दळ याचा गैरफायदा घेत ही वाहनचोरी होत आहे.

मागील वर्षात २८० वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली होती, मात्र या वर्षी केवळ सात महिन्यात २१५ वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत. वाहनचोरी करणारे चोरटे दिवसा रेकी करतात. त्यामुळे आपली वाहने शक्यतो अनोळखी ठिकाणी पार्क करू नयेत. वाहने पार्क करताना सुरक्षेसाठी लॉक करणे आवश्यक आहे. इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, अशा ठिकाणची वाहने मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांमध्ये संताप

वाहनचोरांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मागील वर्षी वाहन चोरीच्या २८० घटना घडल्या होत्या. त्यापैकी केवळ ३१ प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे वाहनचोर पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांना या वाहनचोरांना पकडण्यात यश येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस