शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:18 AM

शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांची उपस्थिती : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांचा आरोप

वाडा : शेतमालाला दीडपट हमीभाव देऊन शेतकरी आत्महत्या रोखू असे म्हणत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असून या सरकारच्या काळात भ्रमनिरास झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्यांत वाढ झाली असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वाडा येथे केली.

भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकरी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी उत्पादन करण्यात कुठेही कमी पडला आहे. शेतीकरीता आलेले नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करत शेतकºयांनी शेतीचे उत्पादन वाढविले. आज कुठेही भूकबळी पडत नाहीत मात्र शेतकरी आत्महत्या करू लागलेत याला आजवरच्या सरकारांची ध्येयधोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

गत कॉंग्रेस सरकारच्या काळात आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या होत होती. मात्र भरमसाठ अश्वासने देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात हे प्रमाण दोन तासावर आल्याने हे चित्र भयावह असल्याने केवळ कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप आणि भाजपला पर्याय म्हणून कॉंग्रेस अशी निवड करणे धोकादायक ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात गरीबांचे - शेतकरी- कष्टकरी वर्गाचे सरकार सत्तेवर यावे म्हणून व्यापक प्रबोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. आजवरच्या सरकारांनी शहरांमध्ये स्वस्त मजूर हवेत म्हणून शेतकºयांच्या विरोधात धोरणे राबविल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. या मारक धोरणाविरोधात सर्व शोषित समाजाने उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असे म्हणत भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर जोरदार टीका पाटील यांनी यावेळी केली. तर देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार गरिबांच्या विरोधात आहे.

मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी कष्टकरी वर्गाला संकटात टाकले असून वाढत्या महागाईने हा वर्ग त्रस्त बनला आहे. या सरकारच्या काळात सर्वच समाजघटक अडचणीत आले असून देशाचा मूळ आधार असलेली लोकशाही धोक्यात आल्याची टीका भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे केंद्रीय समतिी सदस्य राजेंद्र परांजपे यांनी यावेळी केली.

यावेळी पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, बुलेट ट्रेनसह विविध लादलेले प्रकल्प रद्द करावेत, सिक्शनच्या जमिनी शेतकºयांना परत करा, फॉरेस्ट प्लॉट कसणाºया शेतकऱ्यांच्या नावे करा, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा द्या यासह अन्य मागण्या करणारे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.

या मोर्चात कॉ. बळीराम चौधरी, संज्योत राऊत, कमा टबाले, लहानू डावरे, रामचंद्र गिंभल, काळूराम लोखंडे, मोहन बोरसे, विष्णू पाडवी, शंकर भोईर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी