शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:07 AM

कर्जाची रक्कम ३ कोटी २४ लाख : कर्ज माफ करा अन्यथा पालघर जिल्हयात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची शक्यता

- रविंद्र साळवे 

मोखाडा : पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळाचे संकट जव्हार मोखाड्यावर कोसळले आहे. दि ठाणे मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ३ कोटी २४ लाख ६६ हजाराचे पिक कर्ज कसे फेडायचे कसे असा प्रश्न एक हजार ४८१ शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.

अतिदुर्गम दरी खोºयात वसलेल्या मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे या ठिकाणी उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही पारंपरिक पद्धतीने बँकेकडून कर्ज घेऊन येथील आदिवासी शेती करत असतो .

वरई, नागली, तूर, उडीद, भात, खुरासणी आदि पिकांचे उत्पादन झाल्यावर यातील वरई उडीद व भात ह्याची विक्री करून बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाते परंतु या वर्षी शेतीतून पीक येण्या ऐवजी शेतकºयांच्या हाती पेंढाच आला आहे.

सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी उत्साहात विविध पिकांची लावणी केली. परंतु पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असतांना पावसाने ओढ दिल्याने शेतीवर झालेल्या विविध रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर कडक उन्हात शेती जागच्या जागीच करपून गेली यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी शेतकºयांनी शेताला आगी लावून दिल्या यामुळे दुष्काळाच्या खाईत बुडालेल्या शेतकºयांना बँकांकडून घेतलेली पीक कर्जे कशी काय फेडायची असा प्रश्न छळतो आहे. तो वेळीच सोडवला नाही तर शेतकºयाच्या आत्महत्यांचे सत्र पालघर जिल्हयातही मोठया प्रमाणात सुरू होण्याची दाट शक्यता शेतकºयांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली.

दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीच्या उत्पादनातून पिका ऐवजी पेंढाच हाती आला आहे यामुळे येथील गरीब शेतकरी पीक कर्ज कसे फेडणार यामुळे सरकारने प्रथमता मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करून पीक कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे-सुनिल भुसारा,( जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर)

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या