शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

रिंगरोड प्रकल्पावरून गडकरींना साकडे, सागरी महामार्गाबाबत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 2:21 AM

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करीता आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली.

वसई  - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करीता आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यासमवेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रु पेश जाधव, माजी महापौर नारायण मानकर उपस्थीत होते.मुंबई सह पालघर जिल्हा तसेच दक्षिण गुजरात कडे जोणारा (समुद्र महामार्ग) कोष्टल हायवे राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार असल्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.कोस्टल रोड सुरु करताना विविध मुद्यांसह त्यांच्या मतदारसंघातील आणि पालघर जिल्ह्यातील काही पायाभूत सुविधांच्या समस्या त्यांनी मंत्री गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्या. यासदंर्भातील निवेदन त्यांनी गडकरींना दिले. त्यामध्ये पालघर जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला जोडण्याची तात्काळ गरज असून आर्थिक आणि पर्यटन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महानगरीय क्षेत्र आणि गुजरात राज्याशी जोडण्यासाठी सुधारणा करण्याची गरज असून ते कॉरिडॉरच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करेल आणि रहदारी कमी करण्यात मदत देखील करणार असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.किनाऱ्यावरील कॉरिडोर आणि रिंग रोड रस्ता अशा दोन रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे. यामध्ये सध्याचा एनएच -८ अस्तित्वात आहे. तर प्रस्तावित खाडी ब्रिजपासून नायगाव पूला पर्यंत मुंबई सागरी रोड म्हणून प्रस्तावित आहे.सागरी महामार्ग पश्चिम किनारपट्टीच्या शहराशी जोडत असला तरी, टेंबीखोडा (पालघर तालुक्यातून) ते म्हारंबळपाडा (वसई तालुका) पर्यंत हा सागरी महामार्ग जोडला तर थेट मुंबई आणि वसई-विरार शहरांना हा महामार्ग जोडला जाईल. त्यामुळे पालघर तालुक्यात वसई-विरार शहराला जोडणारे प्रमुख ब्रीजचा समावेश करु न लवकरात लवकर त्यांस मंजुरी मिळावी या करिता विनंती करण्यांत आली.याच बरोबर ३७ किमीचा शहराला चारही बाजूने जोडणारा महापालिकेने प्रस्तावित केलेला रिंग रोड एमएमआआरिडए मार्फत लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी करण्यात आली.नायगाव पूर्व ते वसई पूर्व फेरीबोटीसाठी मागणीसागरमाला योजने अंतर्गत ठाणे-भाईदर-वसई फेरिबोट सेवा सुरु होणार असून विविध ठिकाणी जेटींची कामे देखील सुरु आहेत. त्यासाठी उल्हास-वसई नदीतून नायगाव पूर्व ते वसई पूर्व फेरीबोट सुरु झाल्यास दैंनदीन हजारो प्रवासी नागरिकांना या सेवेचा फायदा होईल. या योजने अंतर्गत मालजीपाडा,ससुनवघर, जुचंद्र,राजावली,टिवरी ते नवघर पूर्व या भागातील नागरीकांना याचा फायदा होणार आहे.वसई विरार शहरातील मुख्य वसई खाडीची सध्या सरासरी २१ मीटर उंची आहे आणि विकास आराखड्यानुसार प्रस्तावित रूंदी ४० मी इतकी आहे. यासाठी सदस्यस्थितीतील खाडी रु ंदिकरण व खोली वाढविणेचे काम महानगरपालिके मार्फत सुरु आहे. खाडीच्या विस्तारानेच केवळ जलवाहतूकीलाच लाभ न होता. वसई विरार शहराला पूरापासून धोका कमी करण्यास मदत होईल असे सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVasai Virarवसई विरार