शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बसने चिरडल्या चार म्हशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 06:04 IST

महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने पापडी येथे चार म्हशींना सकाळी चिरडले. त्यातील दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर

वसई : महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने पापडी येथे चार म्हशींना सकाळी चिरडले. त्यातील दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी आहेत. सकाळी दाट धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. मे भगीरथी ट्रान्सपोर्ट मार्फत वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा चालविली जाते. गुरूवारी सकाळी ६ वाजता वसई गांव ते अंबाडी (वज्रेश्वरी) हि बस पापडी उमेळा फाटा, साई सर्व्हीस सेंटर येथून जात असतांना अचानक बसच्या समोर चार म्हशी आल्याने त्या चिरडल्या गेल्या त्यात दोन म्हशींचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. या बसचा चालक विश्वनाथ सखाहरी वाघमारे याने या मार्गावर सकाळी मोठे धुके पडले होते. समोरून येणा-या ट्रकमुळे बिथरलेल्या म्हशी अचानक समोर आल्यामुळे हि दुर्घटना घडली. त्यांना वाचविण्याचाही मी प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.

पापडी गुरूद्वाराजवळ अल्माका नवाब मिसाळ या तबेल्यावाल्याकडे सहा म्हशी आहेत. सकाळी चार वाजता दुध काढून झाल्यावर त्यातील चार म्हशी तबेल्याबाहेर नजर चुकवून आल्या होत्या. त्यांचा शोध घेत असतांना त्यांना ६.३० वाजता अपघात झाल्याचे त्यांना समजले.त्यांचे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. जखमी म्हशींवर उपचार सुरू आहेत. परंतु त्या वाचू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वसई गांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे तसेच म्हशी बिथरून अचानक परिवहनच्या बस समोर आल्यामुळे हा अपघात घडला आहे .अहवाल आल्यावर जर चालक दोषी आढळल्यास त्याला त्वरीत निलंबित करण्यात येईल.- प्रीतेश पाटील,परिवहन सभापतीपरिवहन सेवा कंपनीच्या माध्यमातून इन्शुरन्स मार्फत बाधीत तबेल्यामालकाला नुकसानभरपाई देण्यात येईल.- मनोहर सकपाळ, ठेकेदार, मे भगीरथी ट्रान्सपोर्ट 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार