शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडावी लागते नदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 11:10 IST

पुलाचा प्रस्ताव प्रलंबित, तलासरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना

सुरेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : आदिवासी समाजाने शिकले पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे,  यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही आदिवासी गावपाड्यात ना चांगले रस्ते ना शाळा, ना नदीवर पूल अशी तलासरी तालुक्यात स्थिती आहे. आदिवासी समाजाच्या मुलांना कच्चा रस्ता आणि नदीच्या पाण्यातून शिक्षणासाठी जावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र तलासरीतील सूत्रकार काटीलपाडा, वेडगपाडा येथील विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे. या पाड्यातील मुलांना शाळेत येण्यासाठी गावातून वाहत जाणारी काळू नदी जीव मुठीत घेऊन पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास शाळेला दांडी मारावी लागते अन्यथा चार किमीचा फेरा मारावा लागतो. 

आदिवासी भागासाठी रस्ते, पूल यासाठीही मोठा निधी खर्च होतो, पण  आदिवासी समाजासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च  केल्याच्या राजकारण्यांच्या वल्गना त्यांच्या फायद्यासाठी आहेत का? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. तलासरीतील सूत्रकार काटीलपाडा, वेडगपाडा येथील  शेकडो मुले शिक्षणासाठी सूत्रकार शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा तसेच सुरतीपाडा येथील खासगी शाळेत येतात. सूत्रकार पुरातन शंकर मंदिर  येथे नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे, पण बंधाऱ्यावरून  जाताना बंधारा निसरडा असल्याने पाय घसरून पाण्यात पडण्याची भीती आहे. यामुळे शालेय मुले, गावातील शेतकरी  पाण्याचा उतार कमी असलेल्या ठिकाणावरून नदी ओलांडतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नदीला अचानक पूरही येतो. अशा वेळी मुले नदी ओलांडत असताना नदीला पूर आल्याने वाहून जाण्याची भीती आहे.

काळू नदीवर पूल बांधावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.  दहा वर्षांपूर्वी नदीवर पूल मंजूर झाला होता. निधी न मिळाल्याने पुलाचे काम रखडले पूल  व रस्ता बांधण्यास एक कोटी निधीची गरज आहे. तलासरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या ठिकाणी पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. पण त्यास अजून मंजुरी न मिळाल्याने मुलांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास नदीपात्रातून सुरू आहे. 

काळू नदीवर शंकर मंदिराजवळ पुलाचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे - सार्वजनिक बांधकाम खाते, तलासरीपूल नसल्याने विद्यार्थी,  गावकऱ्यांनाही नदी पात्रातून ये-जा करावी लागते. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.- रत्ना शिडवा रयात, पालक

नदीवर पूल मंजूर होता, पण तो बनविण्यात आलेला नाही. पूल नसल्याने विद्यार्थ्यांना चार किमीचा प्रवास करावा लागतो. - माधुरी धर्मा गोवारी, सरपंच, सूत्रकार 

टॅग्स :palgharपालघरSchoolशाळाEducationशिक्षण