शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वसईतील फुलशेती धोक्यात, पावसामुळे झाडांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:59 IST

शेतकरी संकटात : पावसामुळे झाडांचे नुकसान

पारोळ : वसईतील फुल शेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले असून झाडावरील फुले भिजल्याने ती खराब झाली. त्यामुळे फुल शेतीला या पावसाने मोठा फटका दिला आहे. यामुळे तालुक्यातील फुल शेती कोमेजली आहे. अती पावसामुळे झाडे उभी आहेत पण फुले येत नसल्याचे चित्र या परिसरात फिरताना दिसते आहे. तर भातशेती प्रमाणे या फुलशेतीची नोंद सातबाऱ्यावर नसल्याने नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांपुढे अडचण उभी राहणार आहे. भातपीक तसेच भाजीपाला या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना शासनाची मदत मिळत असते, पण सातबाºयामुळे हे फुल शेतकरी नेहमी शासकीय मदतीपासून वंचित राहतात. आता या पावसाने केलेल्या फुलशेतीचे पंचनामे करून आम्हाला प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वसई फुलशेतीसाठी प्रसिद्ध असून या फुलांना मुंबईच्या बाजारात मोठी मागणी आहे. सोनचाफा, मोगरा, कागडा, नेवाली, तुळस, लिली, गुलाब, जास्वंदी, केवडा, आदी फुलांची शेती येथे केली जाते. शेतकरी या फुलांची विक्री मुंबई बाजारात करतात. सकाळी पहिल्या लोकलला शेतकरी ही फुले विक्रीसाठी नेतात. इतर ठिकाणाहून येणाºया फुलांपेक्षा वसई मुंबईजवळ असल्याने ही फुले ताजी असतात. तर रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने ती सुगंधी तसेच टिकाऊ असतात. यामुळे वसईतील सोनचाफ्याला मोठी मागणी आहे. या फुलशेतीवर वसईकरांचे आर्थिक गणित अवलंबून असून या फुलशेतीची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. पण यंदा पावसाने फुलशेतीचे मोठे नुकसान केले असून हजारो शेतकरी बाधित झाले आहेत. झाडांना अति पाणी झाल्याने फुले खराब होत फुलझाडालाही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ती जगवण्यासाठी औषधे वापरावी लागणार असल्याने त्यासाठी शेतकºयांना मोठा खर्च करावा लागणार आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात पीक वाया गेल्याने पुढील खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न या शेतकºयांपुढे आहे.वसईतील पावसामुळे झालेल्या फुल शेतीच्या नुकसानीची चे पंचनामे करून त्या शेतात कोणते पीक आहे.यांची नोंद करून नुकसान भरपाई साठी प्रशासनाकडे पाठवली जाईल-किरण सुरवसे, तहसीलदार वसइमहाराष्ट्रात प्रशासन फक्त भात, ऊस कापूस, सोयाबीन या पिकांच्या नुकसानीचीचे पंचनामे केले जात असून फुल शेती चा कोणीही बोलत नसल्याने आम्हा फुल शेतकºयांना सापत्न वागणूक दिली जात आहे.-सुभाष भट्टे, फुल शेतकरी वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस