शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

माशांच्या दरात मोठी घसरण; मच्छीमारांची आर्थिककोंडी; सातपाटीतील माशांना जगभरात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:33 IST

संपूर्ण राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्य व्यवसायात पापलेट, दाढा, घोळ, सुरमई आदी माशांच्या उत्पादनासाठी अग्रेसर गाव म्हणून परिचित आहे.

- हितेन नाईकपालघर : पापलेट (सरंगा) खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पापलेटच्या दरात सुमाारे ५० ते ५५ रुपयांची घट करत अनेक समस्यांशी झगडत असलेल्या मच्छीमारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. व्यापारी खरेदीदार कमी येत असल्याने दर ठरविण्यात स्पर्धा निर्माण होत नसल्याचा फटका मच्छीमारांना बसतो आहे.संपूर्ण राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्य व्यवसायात पापलेट, दाढा, घोळ, सुरमई आदी माशांच्या उत्पादनासाठी अग्रेसर गाव म्हणून परिचित आहे. दालदा या पारंपरिक मासेमारी पद्धतीने पकडलेल्या माशांचे योग्य ते नियोजन करून वेळीच बर्फ मारून ते साठवणूक करण्याच्या पद्धतीमुळे ताज्या आणि चवीच्याबाबत सातपाटीच्या पापलेटला जगभरात मोठी मागणी असते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्था आणि सर्वोदय सहकारी संस्थांनी व्यापारांसोबत ठरवलेला ‘दर’ पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास सर्वच बंदरात लागू होत असे. मुंबईतील माशांची निर्यात करणाºया कंपनीपैकी चिराग इंटरनॅशनल, अल्लाना फिश, कॅस्टॉल रॉक, हरून अ‍ॅण्ड कंपनी, श्रॉफ इंटरप्रयसेस, चांम फिश आदी अग्रगण्य कंपन्या पावसाळी बंदी उठण्यापूर्वीच सहकारी संस्थांमध्ये टेंडर मिळविण्यासाठी तळ ठोकून रहात असत. दोन्ही सहकारी संस्थांचे संचालक आणि तांडेल प्रमुख एकत्रपणे उघड टेंडर पद्धतीने भाव ठरवीत आपले सर्व मासे या व्यापाºयांनाच देत असत. मासेमारी हंगामाच्या पहिल्या चार महिन्याचा भाव ठरल्यानंतर पुन्हा पावसाळी बंदीपर्यतच्या उर्वरीत महिन्यांसाठी वाढीव दर अशा दोन हंगामासाठी वेगवेगळा भाव ठरविला जात असतो. यावेळी दोन्हीकडून भावाचे योग्य नियोजन केले जात असल्याने अनेक वर्षांपासून व्यापारी आणि मच्छीमारांमध्ये खूपच जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते.१ जून ते ३१ जुलै या पावसाळी बंदी कालावधीनंतर समुद्रात निर्माण होणाºया तुफानी लाटा, वादळी वारे यामुळे संपूर्ण समुद्र घुसळला जातो. यामुळे मत्स्य साठे खोल समुद्रातून ५० ते ७५ नॉटिकल क्षेत्रात सुरक्षित जागेचा आसरा घेत असतात. ही नेमकी जागा शोधून त्यांना आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी समुद्रात सर्वप्रथम जाण्याची अहमिका मच्छीमारांमध्ये लागलेली असते. कारण पावसाळी बंदी उठल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यात मिळणारा पापलेट नंतरच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास दुर्मिळ होत असल्याने सुरुवातीच्या कालावधीत जास्तीत जास्त मासे पकडून मोठी आर्थिक आवक जमवण्याचे ध्येय प्रत्येक मच्छीमार ठेवीत असतात. त्यामुळे पहिल्या हंगामातील प्रत्येक दिवस मच्छीमारांसाठी महत्त्वपूर्ण असतो.मागच्या एप्रिल, मे महिन्यात पापलेटच्या लहान पिल्लंची मासेमारी इतर वर्षाच्या तुलनेने कमी प्रमाणात झाल्याचा फायदा होत मच्छीमाराना या मोसमात चांगल्या प्रमाणात वाढ झालेला पापलेट मिळेल, असा विश्वास मच्छीमारांमध्ये होता. परंतु अगदीच १०० ते २०० ग्राम वजनाचे पुरेशी वाढ न झालेले लहान पापलेट मच्छीमारांच्या जाळ्यात येत आहेत.पहिल्या सीझनमध्ये मिळणारे मुबलक पापलेट यंदा कमी : सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेमध्ये एकूण १३२ बोटी असून मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्यानंतर एकूण फक्त २७ हजार ६६ किलो पापलेट मिळाले असून त्यापैकी २२ हजार २९९ किलो पापलेट हे छोट्या आकाराचे मिळाले आहेत तर मच्छीमार सहकारी संस्थेत ही १० हजार किलो पापलेट मिळाले असून त्यांच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नेहमीच पहिल्या सिझनमध्ये मिळणारे मुबलक पापलेट यावेळी खूप कमी प्रमाणात मिळत असल्याने ८ ते १० लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन मासेमारीला उतरलेले मच्छीमार बांधव धास्तावले आहेत.नुकसान भरून काढण्यासाठी सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशीलगेल्यावर्षी व्यापाºयांकडून दरात साधारणपणे १७१ रुपयांची कपात केली होती. त्यासाठी मागच्या वर्षीचे आमचे मासे अजून शिल्लक असून डॉलरचा भाव घसरणे, मासे आयात करणाºया चीनशी दुरावत चाललेले संबंध आदी कारणे दिली होती. यंदा अशी परिस्थिती नसतानाही व्यापाºयांनी दरात केलेली कमतरता मच्छीमारांच्या जीवावर उठणारी आहे. त्यातच पापलेट माशांची खरेदी करणाºया विश्वासू व्यापाºयांची संख्या कमी होत असल्याचा फायदा त्यांना होत असून आर्थिक फटका मात्र मच्छीमारांना सहन करावा लागतो आहे. १० दिवसांत मच्छीमारांचे सुमारे २२ ते २५ लाखांचे नुकसान झाले असून ते भरून काढण्यासाठी दोन्ही सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.व्यापाºयांची संख्या कमी झाल्याने दर ठरविताना स्पर्धा निर्माण होत नाही. याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे.- जयप्रकाश मेहेर, अध्यक्ष,कव-दालदा संघर्ष समितीसंस्थांच्या सर्व बोटधारकाना योग्य दर मिळावा म्हणून आम्ही संचालक नेहमीच प्रयत्नशील असतो. शासनाने शेतकºयाप्रमाणे आम्हालाही हमी भाव द्यावा.- पंकज म्हात्रे, व्यवस्थापक,सर्वोदय सहकारी संस्थाराज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्य व्यवसायात पापलेट, दाढा, घोळ, सुरमई आदी माशांच्या उत्पादनासाठी म्हणून परिचित आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार