शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पहिल्याच पावसात ‘महावितरणची बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:14 IST

वसई, नालासोपारा, मनोर, बोईसर, जव्हार शहर अंधारात : एकाचा मृत्यू, घरांवरील पत्रे उडाले, अनेक वृक्ष, विजेचे खांब कोसळले

नालासोपारा : वसई तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या अत्यंत तुरळक पहिल्याच पावसामुळे महावितरणची बत्ती गुल झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण झाला आहे.

वसई, विरार पश्चिम व नालासोपारा शहरात आठच्या सुमारास वीज गेली ती रात्री अडीचच्या सुमारास आली. तर पूर्वेकडील परिसरात मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली. नाममात्र पाऊस पडूनही आणि वारा वगैरे नसतांनाही वीज जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये महावितरण विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या वीज जाण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा परिसरात मेन लाइनवर झाड पडल्याने वीज गेल्याचे सांगण्यात आले. पावसाळा अद्याप सुरू झाला नाही तर महावितरणच्या विजेचा सावळागोंधळ सुरू झाला असून अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरु वात केली आहे. याबाबत सुधारणा झाली नाहीतर अनेक संघटना आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.वीज २२ तास गायब, २७५ गावपाडे बुडाले अंधारातमनोर : पहिल्या पावसातच पालघर तालुक्यातील टाकव्हल सवरखंड सबसेंटरमध्ये ट्रान्सफार्मर जळल्याने २७५. गाव पाड्यातील वीज२२ तास खंङित झाल्याने जनतेचे प्रचंड हाल झाले. रविवारी संध्याकाळी पावसाने वादळीवाºया सहित हजेरी लावली. त्यामुळे टाकव्हल सवरखंड येथील महावितरणचे सबसेंटर आहे. या परिसराला वीज पुरविणाºया ट्रान्सफार्मरमध्ये त्यात पाणी शिरल्याने तो जळाला. त्यामुळे वीज खंडित होऊन सर्वत्र अंधार पसरला. २२ तास वीज खंडित झाल्याने परिसरातील हॉटेल चालक, पेट्रोलपंप तसेच नागरी वस्तीमधील दुकानदार लहान मुले व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गणवीर अधिकारी वीज मंडळ यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले, ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने वीज खंडित झाली.जव्हरला पावसाने झोडपलेच्जव्हार : जव्हारमध्ये सोमवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले, मंगळवारी मात्र दिवसभर उन्हाचे असह्य चटके लागत होते, सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामुळे सर्वत्र गारवा पसरला. मात्र या पावसामुळे मात्र महावितरण विभागाचे नखरेसुरू झाले असून वारंवार वीज खंडीत होत आहे. त्यामुळे उकाडा वाढतो आहे.च्पावसाने लावलेल्या हजेरीमुळे परीसर जलमय झाला होता. बळीराजा आता पेरणीच्या कामाला लागला आहे. कुडा-मातीच्या घरांवर व गोठ्यांच्या छतावर व आजूबाजूने प्लास्टीक अथवा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर नांगरणीला व हंगामपूर्व कामांना आता वेग येईल.विजेचा शॉक लागून तरु णाचा दुर्दैवी मृत्यूच्वाडा, तालुक्यातील कंचाड पासून काही अंतरावर असलेल्या शेलरपाडा येथील एक तरु णाच्या सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्याचे लक्षात आल्याने त्याने स्विच बोर्ड तपासण्याचा प्रयत्न केला असता त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे.च्कंचाड पासून अवघ्या तीन किलोमीटर असलेल्या शेलार पाडा येथील एकनाथ झपिर शेलार (२७) हा सकाळी झोपेतून उठला असता घरातील विद्युत पुरवठा बंद असल्याचे लक्षात आल्याने त्याने स्विच बोर्ड उघडून पाण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एक तुटलेली वायर लोम्बकळत असल्याने त्याचा त्या वायरला स्पर्श होऊन जबरदस्त शॉक लागल्याने तो खाली पडला, त्याला तात्काळ वाडा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तो मयत झाला असल्याचे डॉ.प्रदीप जाधव यांनी सांगितले.च्एकनाथ हा मेहनती व घरातील कमावता व्यक्ती होता तो टेम्पो चालवून परिवाराचा उदरिनर्वाह करत होता. त्याच्यामागे आई,पत्नी व दोन मुली असा परिवार आहे एक वर्षांपूर्वीच त्याचे वडीलही वारले आहेत.वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊसवसई : वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने वसई-विरार पट्ट्यात सोमवारी रात्री १० वाजल्यानंतर हजेरी लावली. वसई, विरार भागात पावसाने बरसात करून लोकांना अचानक चिंब केले. काही मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्याने रस्ते ओले झाले व उकाड्याने त्रस्त लोकांना काही अंशी तर गारवा मिळाला. त्यातच सोसाट्याचे वारे व विजेचा कडकडाट होत असल्याने खबरदारी म्हणून वसई विरार व काही भागातील वीजपुरवठा बºयाच तासासाठी खंडित करण्यात आला होता. दरम्यान अखेर उशिरा का होईना मात्र वरु णराजाने वसईत आगमन केले. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आता बळीराजा शेतीच्या कामांना सुरुवात करणार आहे. त्यासाठी लागणारी अवजारे आणि सामग्री खरेदी करण्यासाठी त्याची धावपळ सुरु आहे. बाजारामध्ये आवश्यकत्या बियाणे आणि औषधे व किटकनाशके यांचीहीउपलब्धता असल्याचे दिसून येते आहे. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार