शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
4
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
5
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
6
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
7
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
8
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
9
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
10
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
11
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
12
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
13
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
14
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
15
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
16
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
17
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
18
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
19
Bigg Boss 19 Finale: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
20
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
Daily Top 2Weekly Top 5

ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची अन् बहुजन विकास आघाडीचीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:26 IST

काटशहात सेनेची सरशी : कमळाने लावली सारी ताकदपणाला, काँग्रेस, डावे पिछाडीवर,बहुरंगी लढत होते आहे फक्त दुरंगी

विक्र मगड : विक्रमगड- पालघरमध्ये निवडणुकीचे वारे सध्या जोरात आहेत, किंबहुना हे वारे वादळी झाले आहेत. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवल्याने सगळ्यांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. खरे तर भाजपच्या एका चुकीनेच या निवडणुकीला इतके महत्त्व आले आहे. ही चूक होती, वनगा पुत्रांची अवहेलना.ज्यांनी भाजपला या भागात ओळख निर्माण करून दिली, पक्ष वाढवला, त्यांनाच आणि त्यांच्या कुटुंबीयांना भाजपने वनगा यांच्या निधनानंतर बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तशी नाराजी वनगापुत्रांनी पत्रकार परिषद घेउन व्यक्त केली होती. ही नाराजी मात्र शिवसेनेच्या पथ्यावर पडली. शिवसेनेने लागलीच वनगापुत्रांना आश्रय देउन त्यांना उमेदवारीही बहाल केली. साहजिकच वनगापुत्रांचा शिवसेना प्रवेश व त्यांना दिली गेलेली उमेदवारी भाजपला बोचणारी आणि त्यांच्या अहंकाराला डिवचणारी ठरली. नंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करून आपण कसे त्यांना उमेदवारी देणार होतो आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत सल्लामसलत केली होती, याचे पाढे वाचले होते. पण एव्हाना शिवसेनेने यात सरशी केली होती आणि पालघरवासीयांची सहानुभूतीही आपल्या बाजूने केली होती.शिवसेनेची ही खेळीच आणि भाजपची ही चूक पालघरची ही निवडणूक प्रतिष्ठेची करणारी ठरली आहे. अन्यथा, ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची झाली नसती. राज्यातील पोटनिवडणुकांत भाजपविरोधी आलेले निकाल, कर्नाटकमध्ये भाजपला आलेली नामुष्की, या सगळ्याचा परिपाक पालघर निवडणुकीत दिसण्याची चिन्हे असल्याने भाजपनेही कंबरेचा कासोटा घट्ट करत मातब्बर नेत्यांना या निवडणुकीच्या प्रचारात उतवण्याचा निर्णय घेतला आहे.याचेच फलित म्हणून उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरारमध्ये येत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आपली तोफ रविवारी नालासोपाऱ्यात येउन डागली आहे. ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची असली तरी याचे चटके आता बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षालाही बसत आहेत. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सुरु वातीलाच भाजप-शिवसेना एकच उमेदवार देणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, असे घोषित केले होते. पण वाघा-सिंहाच्या या लढाईत आता संपूर्ण जंगलातच वणवा भडकला असून, आपल्या गुहेत निवांत असलेल्या बविआसारख्या हरणाचीही होरपळ होणार आहे.पालघरची ही पोटनिवडणूक आता वेगळ्या वळणावर येउन ठेपली आहे. या निवडणुकीला केवळ या निवडणुकीचेच कंगोरे राहिलेले नाहीत. तर ही निवडणूक पुढील निवडणुकांवरही प्रभाव टाकणारी ठरणार आहे. आणि याचे जास्तीत जास्त चटके भविष्यात बविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कधी नव्हे, ते अनेकानेक मातब्बर नेते पालघर आणि वसई-विरारची धूळ उडवत आहेत.नुकतेच राज ठाकरे या भागात येउन गेले होते. त्यांच्या येण्याने या भागात चैतन्य होते. पण राज ठाकरे यांचे भाषण मनसे आणि वसईकरांच्या अपेक्षेला उतरले नाही. त्यांनी भाजपवर आणि मोदींवर तोंडसुख घेतले. पण सत्ताधारी बहुजन विकास आघाडीविरोधात बोलणे टाळले. त्यामुळे बविआ निश्ंिचत झाली. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांना तसे अपेक्षितच होते. अशीच अपेक्षा रविवारच्या सभेत बविआला मुख्यमंत्र्यांकडून होती. तर वसईकरांचा समज मुख्यमंत्री तसे काही बोलणार नाहीत, असा होता.पण राज ठाकरे यांनी केलेली चूक मुख्यमंत्र्यांना करून भागणार नव्हते. अप्रत्यक्ष का होईना, मुख्यमंत्र्यांनी बविआवर टीका करून त्यांचीच शिट्टी वाजवत त्यांना सूर्याचे पाणी दाखवले आणि वसईकरांनाही धक्का दिला. राज ठाकरे यांनी बविआवर बोलणे टाळल्याने वसईकरांची राज ठाकरे यांच्यावरील नाराजी बविआला मते देणार नाही. तर राज ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका आणि मराठी माणूस हा मुद्दा शिवसेनेच्या पारड्यात अप्रत्यक्ष मते टाकणारा ठरेल. तर मुख्यमंत्र्यांनी बविआवर टीका करून नालासोपारा आणि वसईतील बविआच्याच परप्रांतीय मतांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बविआच्या गोटात थोडी का होईना, खळबळ असेलच.मनोज तिवारी यांची विरार ते नालासोपारा प्रचार रॅली आणि उद्या विरारमध्ये येत असलेले योगी आदित्यनाथ हा भविष्यातील निवडणुकांचा ट्रेलर आहे, हे कदाचित बविआच्या लक्षात आले असेलच. कधी काळी भाजपच्या राम नाईक यांच्याविरोधात गोविंदाला पाठिंबा देउन बविआने या भागातील परप्रांतीयांना चुचकारले.बविआची ही खेळी यशस्वीही ठरली होती. पण या लढाईत एका अभ्यासू नेत्याचा झालेला पराभव कुणाच्याच पचनी पडला नव्हता. त्यानंतर गोविंदा या भागात किती वेळा आला हादेखील संशोधनाचा विषय ठरला होता. या निवडणुकी निमित्ताने भाजपलाही बविआवरील उट्टे काढण्याची संधी मिळाली आहे.ती अशी. बविआच्या तीन आमदारांचे समर्थन राज्यात भाजपला आहे, पण पालघरची खासदारकीही भाजपला सोडायची नाहीये. ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठा आहे. या सगळ्याचा लेखाजोखा रविवारी मुख्यमंत्र्यांनी मांडला. पण आता या गडाला हळूहळू का होईना सगळेच पक्ष ढुसण्या देउ लागले आहेत. उद्या या भागात विरोधकांची ताकद वाढेल.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपा