शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची अन् बहुजन विकास आघाडीचीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:26 IST

काटशहात सेनेची सरशी : कमळाने लावली सारी ताकदपणाला, काँग्रेस, डावे पिछाडीवर,बहुरंगी लढत होते आहे फक्त दुरंगी

विक्र मगड : विक्रमगड- पालघरमध्ये निवडणुकीचे वारे सध्या जोरात आहेत, किंबहुना हे वारे वादळी झाले आहेत. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवल्याने सगळ्यांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. खरे तर भाजपच्या एका चुकीनेच या निवडणुकीला इतके महत्त्व आले आहे. ही चूक होती, वनगा पुत्रांची अवहेलना.ज्यांनी भाजपला या भागात ओळख निर्माण करून दिली, पक्ष वाढवला, त्यांनाच आणि त्यांच्या कुटुंबीयांना भाजपने वनगा यांच्या निधनानंतर बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तशी नाराजी वनगापुत्रांनी पत्रकार परिषद घेउन व्यक्त केली होती. ही नाराजी मात्र शिवसेनेच्या पथ्यावर पडली. शिवसेनेने लागलीच वनगापुत्रांना आश्रय देउन त्यांना उमेदवारीही बहाल केली. साहजिकच वनगापुत्रांचा शिवसेना प्रवेश व त्यांना दिली गेलेली उमेदवारी भाजपला बोचणारी आणि त्यांच्या अहंकाराला डिवचणारी ठरली. नंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करून आपण कसे त्यांना उमेदवारी देणार होतो आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत सल्लामसलत केली होती, याचे पाढे वाचले होते. पण एव्हाना शिवसेनेने यात सरशी केली होती आणि पालघरवासीयांची सहानुभूतीही आपल्या बाजूने केली होती.शिवसेनेची ही खेळीच आणि भाजपची ही चूक पालघरची ही निवडणूक प्रतिष्ठेची करणारी ठरली आहे. अन्यथा, ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची झाली नसती. राज्यातील पोटनिवडणुकांत भाजपविरोधी आलेले निकाल, कर्नाटकमध्ये भाजपला आलेली नामुष्की, या सगळ्याचा परिपाक पालघर निवडणुकीत दिसण्याची चिन्हे असल्याने भाजपनेही कंबरेचा कासोटा घट्ट करत मातब्बर नेत्यांना या निवडणुकीच्या प्रचारात उतवण्याचा निर्णय घेतला आहे.याचेच फलित म्हणून उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरारमध्ये येत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आपली तोफ रविवारी नालासोपाऱ्यात येउन डागली आहे. ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची असली तरी याचे चटके आता बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षालाही बसत आहेत. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सुरु वातीलाच भाजप-शिवसेना एकच उमेदवार देणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, असे घोषित केले होते. पण वाघा-सिंहाच्या या लढाईत आता संपूर्ण जंगलातच वणवा भडकला असून, आपल्या गुहेत निवांत असलेल्या बविआसारख्या हरणाचीही होरपळ होणार आहे.पालघरची ही पोटनिवडणूक आता वेगळ्या वळणावर येउन ठेपली आहे. या निवडणुकीला केवळ या निवडणुकीचेच कंगोरे राहिलेले नाहीत. तर ही निवडणूक पुढील निवडणुकांवरही प्रभाव टाकणारी ठरणार आहे. आणि याचे जास्तीत जास्त चटके भविष्यात बविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कधी नव्हे, ते अनेकानेक मातब्बर नेते पालघर आणि वसई-विरारची धूळ उडवत आहेत.नुकतेच राज ठाकरे या भागात येउन गेले होते. त्यांच्या येण्याने या भागात चैतन्य होते. पण राज ठाकरे यांचे भाषण मनसे आणि वसईकरांच्या अपेक्षेला उतरले नाही. त्यांनी भाजपवर आणि मोदींवर तोंडसुख घेतले. पण सत्ताधारी बहुजन विकास आघाडीविरोधात बोलणे टाळले. त्यामुळे बविआ निश्ंिचत झाली. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांना तसे अपेक्षितच होते. अशीच अपेक्षा रविवारच्या सभेत बविआला मुख्यमंत्र्यांकडून होती. तर वसईकरांचा समज मुख्यमंत्री तसे काही बोलणार नाहीत, असा होता.पण राज ठाकरे यांनी केलेली चूक मुख्यमंत्र्यांना करून भागणार नव्हते. अप्रत्यक्ष का होईना, मुख्यमंत्र्यांनी बविआवर टीका करून त्यांचीच शिट्टी वाजवत त्यांना सूर्याचे पाणी दाखवले आणि वसईकरांनाही धक्का दिला. राज ठाकरे यांनी बविआवर बोलणे टाळल्याने वसईकरांची राज ठाकरे यांच्यावरील नाराजी बविआला मते देणार नाही. तर राज ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका आणि मराठी माणूस हा मुद्दा शिवसेनेच्या पारड्यात अप्रत्यक्ष मते टाकणारा ठरेल. तर मुख्यमंत्र्यांनी बविआवर टीका करून नालासोपारा आणि वसईतील बविआच्याच परप्रांतीय मतांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बविआच्या गोटात थोडी का होईना, खळबळ असेलच.मनोज तिवारी यांची विरार ते नालासोपारा प्रचार रॅली आणि उद्या विरारमध्ये येत असलेले योगी आदित्यनाथ हा भविष्यातील निवडणुकांचा ट्रेलर आहे, हे कदाचित बविआच्या लक्षात आले असेलच. कधी काळी भाजपच्या राम नाईक यांच्याविरोधात गोविंदाला पाठिंबा देउन बविआने या भागातील परप्रांतीयांना चुचकारले.बविआची ही खेळी यशस्वीही ठरली होती. पण या लढाईत एका अभ्यासू नेत्याचा झालेला पराभव कुणाच्याच पचनी पडला नव्हता. त्यानंतर गोविंदा या भागात किती वेळा आला हादेखील संशोधनाचा विषय ठरला होता. या निवडणुकी निमित्ताने भाजपलाही बविआवरील उट्टे काढण्याची संधी मिळाली आहे.ती अशी. बविआच्या तीन आमदारांचे समर्थन राज्यात भाजपला आहे, पण पालघरची खासदारकीही भाजपला सोडायची नाहीये. ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठा आहे. या सगळ्याचा लेखाजोखा रविवारी मुख्यमंत्र्यांनी मांडला. पण आता या गडाला हळूहळू का होईना सगळेच पक्ष ढुसण्या देउ लागले आहेत. उद्या या भागात विरोधकांची ताकद वाढेल.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपा