शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

चोरीची वीज पकडली म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 03:32 IST

महावितरणचे कर्मचारी संतप्त : राजकीय दबाव असल्याचा आरोप

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील भाटिबंदर परिसरातील एका घरातील वीज चोरी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने पकडल्याचा बदला घेण्यासाठी चक्क त्या दोघांवर राजकीय दबाव टाकून अर्नाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची व पोलिसांनी त्यांना अटक केल्याची घटना घडली आहे. त्याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आगाशी येथील भाटिबंदर परिसरात राहणारे संतोष थापड ह्यांचे लाईट मीटर थकबाकीमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढून नेले होते त्यामुळे ते चोरीची वीज वापरत असल्याने त्यांच्यावर 28 मार्च 2019 ला सहायक अभियंता राहुल सोयाम (25) आणि विद्युत सेवक पांडुरंग चव्हाण (27) यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला. 29 मार्चला या विभागातील महावितरणच्या कार्यालयावर संतोष थापड यांनी स्थानिक नगरसेविका आणि 30 ते 40 महिला नेऊन दमदाटी करून धमकी व शिवीगाळ केली. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांना अवाजवी लाईट बिले देता, ती ही वेळेवर देत नाही अशी कारणे सांगून गोंधळ घातला. तसेच अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर संतोष थापड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली व वसई न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

झालेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी राजकीय दबाव वापरून थापड यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात राहुल आणि पांडुरंग चव्हाण यांच्या विरोधात ३१ मार्च २०१९ (रविवारी) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक करून वसई न्यायालयात सोमवारी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यावर पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना जामीन मिळाला. महावितरणचे जवळपास १५० ते २०० अधिकारी व कर्मचाºयांनी वसई न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.पोलिसांनी स्थानिक नगरसेविकेच्या राजकीय दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केला असून आमच्या अधिकारी व कर्मचाºयांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी दोघांना मागच्या गुन्ह्याबाबत काम असल्याचे खोटे बोलून त्यांना बोलावून अटक केले आहे. लवकरच आमच्या सर्कल असोसिएशनची मिटिंग घेऊन न्याय मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यासाठी दिशा ठरवली जाईल.- लक्ष्मण राठोड, सहसचिव, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनया प्रकरणात पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता तातडीने गुन्हा दाखल करून इतक्या लवकर अटक कशी काय केली ? यात काही राजकीय दबाव आहे की काही आर्थिक व्यवहार ?- अनवर मिर्जा, कार्यकारीअभियंता, विरार विभागया गुन्ह्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी संपूर्ण चौकशी करूनच पुढील कारवाई केलेली आहे. आमच्याकडे तक्र ार देण्यास कोणीही आले की तक्र ार घेऊनच त्याची रितसर चौकशी करून कारवाई केली जाते.- अप्पासाहेब लेंगरे, पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाणे, अर्नाळा

टॅग्स :electricityवीजPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी