शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

सूर्याच्या पाण्यापासून विक्रमगडचे शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:55 AM

धरण उशाला; तरी कोरड घशाला

विक्रमगड : तालुक्यात १९७८ साली धामणी-कवडास या ठिकाणी सूर्या धरणाचे काम सुरु करण्यांत आले होते़ हे धरण विक्रमगड तालुक्यात येत असून या धरणांत लाखो गॅलन पाण्याचा मोठा साठा आहे़ परंतु गेल्या २० ते २५ वर्षात या धरणातील पाण्याच्यासाठयापैकी १ लिटर पाणी देखील स्थानिक लहान मोठया शेतकरी वर्गास गाव-पाडयांतील रहिवाशांच्या गावात पुरविण्यांत आले नसल्याचा आरोप येथील जनता करीत आहे़ या धरणाच्या पाण्यापासून विक्रमगड तालुका वंचित राहीलेला आहे.एकीकडे पाणी टंचाई व पाण्याचा साठा असूनही पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे अशी खंत येथील शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.विक्रमगड तालुक्यांतील बहुसंख्य शेतक-यांना हया धरणाचे पाणी देण्यासाठी साधा विचार देखील झाल्याचे दिसून येत नाही़ विक्रमगड तालुक्यातील तलवाडा मार्गे हे पाणी विक्रमगड तालुक्यात फिरविले तर हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊन शेतकरीवर्गाचा मोठा फायदा होईल़ व नगदी पिके घेता येऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल़ या भागातील शेतकरी फुलबाग (मोगरा, झेंडु आदी़), भाजीपाला (गवार वगैरे) कडधान्यांमध्ये (काळा हरभरा), बागायतीमध्ये (आंबा, चिकू) यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेत आहे ज़र या धरणाचे पाणी या तालुक्यांस दिले गेले तर येथील शेतकरी द्राक्षे, ऊस अशा बारमाही पिकांचे उत्पादन वाढवू शकतील़व निश्चितपणे पश्चिम महाराष्टÑाप्रमाणे पिके घेऊ शकल्यास त्यांना दुधाचा व पोल्ट्रीचा व्यवसाय करता येईल.तालुक्याची उन्नती होईलस्थंलातरीत जो मजुर आहे त्यांस देखील जागेवर काम मिळेल व त्यांची परवड थांबेल त्यामुळे संबंधीत विभाग व शासनाने यांचा सखोल गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे़ विक्रमगड तालुक्यांत धरण आहे परंतु त्यांचा लाभ शेजारील ५ तालुक्यांस होतो व तेथील शेतकरी वर्ग नगदी पिके घेवुन आपली प्रगती करीत आहेत.

टॅग्स :Damधरण