शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भात खरेदी केंद्राअभावी शेतकरी त्रस्त; कमी दरात व्यापाऱ्यांना भात विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:05 IST

आर्थिककोंडीमुळे भूमिपुत्र हैराण

पारोळ : आधीच अस्मानी संकटाने पूर्ण कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारी छळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी वसईत अद्याप भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकरीवर्गाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मदतही तुटपुंज्या स्वरूपात जाहीर झाली आहे, मात्र तीही अद्याप शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाही. रब्बी पिकांच्या खर्चाचा मेळ भात पीक विकून शेतकरी बसवत असतो. पण वसईत भात खरेदी केंद्र उपलब्ध न झाल्याने व्यापाऱ्यांना कमी दरात भात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वसई तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यात भाताचे एकमेव पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. प्रत्यक्ष भाताचे उत्पादन, वाढलेले मजुरीचे दर आणि शासनाने जाहीर केलेली आधारभूत हमीभाव रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भात कसण्यास शेतकऱ्यांना परवडत नाही.

भाताचे कोठार समजल्या जाणाºया वसई पूर्व भागात खासगी व्यापाºयांची चंगळ सुरू असून शेतकºयांच्या गरजेचा फायदा घेऊन हे व्यापारी कवडीमोलाने भात खरेदी करत आहेत. वसई तालुक्यात पहिले भात खरेदी केंद्र शिरवली येथील सेवा सोसायटीच्या गोदामात सुरू झाले. नंतर ते भिनार व मेढे येथे हलवले. या वर्षीही वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्रे मंजूर असताना अजूनही ती सुरू झाली नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे, तर शिरवली हे ठिकाण या केंद्रासाठी योग्य असल्याने या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना १२०० ते १३०० रु. क्विंटल दराने भात पीक खाजगी व्यापारी यांना विकावे लागत आहे, तर या वर्षी भात खरेदी केंद्राचा १७५० हमी भाव असून २०० रुपये महाराष्ट्र शासनाचा बोनस आहे. यामुळे वसईत भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.- रमेश घरत, अध्यक्ष, शिरवली सेवा सोसायटी

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार