शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आमसभेत विकासाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 3:09 AM

आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला.

सुरेश काटे।तलासरी : बहुप्रतिक्षित आमसभा बुधवारी संपन्न झाली असेच म्हणावे लागेल. कारण विकासाच्या मद्यांवर चर्चा न होताच ती अटोपती घेतल्याने नागरिक नाराज झाले. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार यावर कारवाईचे आदेश देण्यात आले असले तरी विविध ग्रामपंचायतीमध्ये झालेला घरकूल घोटाळा चर्चेला येऊ न दिल्याची मॅनेजमेंट सर्वांचाच लक्षात आली.सभेला सुरुवात होताच विविध खात्याच्या प्रमुखाची हजेरी घेता जास्त संख्येने खाते प्रमुख अनुपस्थित होते यावेळी नागरीक संतप्त झाले होते. आमसभेत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, शिक्षण , कृषी , बी एस एन एल, वन विभाग, नगर पंचायत, पाणी पुरवठा, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुख्यमंत्री सडक या विभागाचे विषय विशेष चर्चेला आले होते.आमसभेला आमदार पास्कल धनारे, गट विकास अधिकारी बी. एन. नाळे, तहसीलदार विशाल दौडकर, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, सभापती संगीता डावरे, उपसभापती वनशा दुमाडा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगराध्यक्ष स्मिता वळवी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच प्रत्येक गावचे सरपंच, नागरीक उपस्थित होते.आदिवासी विकास विभाग मार्फत २००९ मध्ये लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विहिरी बांधून न देता अधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचे दाखले देऊन आलेला निधी अधिकाºयांनी व ठेकेदाराने हडपला हे निदर्शनात आणून देताच अशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बाल विकास प्रकल्पात गेल्या वर्षी कपाट घोटाळा झाला त्याचा अहवाल गेल्या वर्षी पासून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे कारवाई साठी पडून आहे त्या चा पाठपुरावा करण्याचे अध्यक्षांनी विभागप्रमुखाला सांगितले. शिक्षण विभागाने शाळा दुरु स्ती चे प्रस्ताव जिल्ह्याला पाठविले आहेत असे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगताच विद्यार्थ्यांचे बळी पडल्यावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनते ने करताच पाठपुरावा करण्या विषयी सांगण्यात आले. तालुक्यात मुख्यमंत्री सडकची कामे निकृष्ट होत असल्याचे लोकांनी सांगितले. उधव्यात मोठ्या प्रमाणात स्फोटाचा वापर करून दगड उत्खनन केले जात असल्याचे तहसीलदार विशाल दौडकर यांच्या निदर्शनात आणून देताच कारवाईचे आश्वासन दिले. उधवा वन विभागाने सुत्रकार येथे २५८०० वृक्ष लागवड केल्याचे सांगताच एवढी वृक्ष लागवड होऊनही जंगले उजाड का हा प्रश्न जनतेने विचारताच आमदारा सह सगळ्यानी पाहणी करण्याचे ठरविले, कृषी विभाग लाभार्थ्यांना लाभ देताना विधवा महिलांचा प्राधान्याने विचार करीत नसल्याचे झाई बोरीगावाचे उप सरपंच अर्जुन वांगड यांनी सांगितलेतलासरी ची पाणी पुरवठा योजना तयार असून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयां च्या मनमानी मुळे लोकांना पाणी मिळत नाही एक महिन्यात फक्त २० नळ कनेक्शन दिले असताना विभागाचे अधिकारी आर. ऐ. पाटील यांनी काम प्रगती पथावर असल्याचे उत्तर दिले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती मध्ये घरकुल घोटाळा असताना त्याचा विषय अधिकाºयांनी चर्चेला येऊ दिला नाही. तालुक्याच्या विकास संदर्भात आमसभा असताना अधिकारी मनमानी उत्तरे देत होत, यावरून अधिकाºयांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून आले.जनता त्रस्त बाबू मस्तउपस्थितांनी आमसभेला जर अधिकारी उपस्थित राहत नसतील तर सभा बरखास्त करा असा आग्रह धरताच काही खात्याचे अधिकारी उपस्थित झाले. यावेळी गैरहजर अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात आली.महत्वाचे म्हणजे आमसभा भर दुपारी घेण्यात आल्याने अनेकांना त्रास झाला. तर काहींनी तेथे जाणे टाळले. एकीकडे अधिकाºयांची गैरहजेरी तर दुसरीकडे कडक उन्हाची वेळ याने तिस फटका बसला.

टॅग्स :Waterपाणी