शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

प्रसुतीच्या असह्य कळा सोसत तिने केला डोलीतून चार किलोमीटरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:06 IST

मोखाड्याच्या आदिवासी पाड्यांत रस्ता नाही, ॲम्ब्युलन्सचा प्रतिसाद नाही, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष...

रवींद्र साळवे -

मोखाडा : राज्याची राजधानी मुंबई, हाकेच्या अंतरावर असणारे माेखाडा.  मात्र आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत  राहणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना माेखाड्यातल्या आदिवासींचे दु:ख  कसे समजणार? परिणामी पाड्यापासून रस्ता नसल्याने असह्य कळा सुरू असतानाही पाच महिन्यांच्या गरोदर महिलेला अखेर डोलीतून चार किलाेमीटर असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागल्याची संतापजनक घटना मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाड्यात घडली. यापूर्वीही अनेकवेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या बातम्या येऊनही प्रत्येक पाड्यापर्यंत साध्या रस्त्याची सोयही न केल्याने प्रशासनाची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष आदिवासींच्या जिवाशी कसे खेळते आहे, हे वास्तव पुन्हा समोर आले.

मोखाडा तालुक्यापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या मुकुंदपाड्यातील दुर्गा मनोहर भोये या पाच महिन्याच्या गरोदर महिलेच्या पोटात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. मदत मिळावी म्हणून कुटुंबीयांनी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. काहीच प्रतिसाद मिळत नव्हता, असे नातलग नरेश भोये यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

अखेर एका बांबूला कांबळ बांधून त्याचीच डोली करून तिला रुग्णालयात नेण्याचे ठरवले. तिन्हीसांजेच्यावेळी डोंगर-दऱ्यांतून पाऊलवाटेने चार किलोमीटर चालत त्यांनी आंब्याचा पाडा गाठला. तेथून तिला आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, पण तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथून तिला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिची प्रकृती सुधारल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा प्रश्न एकट्या दुर्गाचा नाही. अशा घटना वारंवार घडतात, असे स्थानिकांनी सांगितले.

कधीकधी रस्त्यातच रूग्ण दगावतो...आमच्या भागात रस्त्याची सोय नाही. रुग्णाला डोली करूनच आठ- आठ किलोमीटर अंतरावर उपचारासाठी न्यावे लागते. कधी कधी एखादा गंभीर रुग्ण रस्त्यातच प्राण सोडतो.  पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो. अशावेळी हताशपणे येईल त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे स्थानिक आदिवासी गणपत भोये यांनी सांगितले.

नेते निवडणुकीपुरतेच १२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयी-सुविधांचा अभाव आहे. पाणी नाही. जवळच्या अंतरावर आरोग्याची व्यवस्था नाही. रस्ताही नाही. निवडणुका आल्या की, मते मागण्यापुरते नेते येतात, असे गाऱ्हाणे पाड्यावरच्या लोकांनी मांडले.  

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल