शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

दुष्काळामुळे बळीराजा खचला, काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:55 IST

जव्हार, मोखाड्यात काँग्रेस आक्रमक : ढिम्म सरकारविरोधात रान उठवले

जव्हार : शेतामध्ये पिक तयार व्हायच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने जव्हार , मोखाडा व वाड्यातील बळीराजाला आभाळाकडे बघण्याची वेळ आली. उन्हाच्या तलखीने उभे पीक करपले. कित्येकांनी आपल्या शिवाराला स्वत:च आग लावल्याच्या घटना घडल्या. मात्र, सरकारने केलेल्या निरीक्षणा अंती या भागाला दुष्काळगृस्त भागाच्या यादीतून वगळल्याने येथील शेतकरी पुरते खचले असून या विरोधात कॉग्रेस पक्षाने आवाज उठवला आहे. शुक्रवारी शिष्टमंडळाने तहसीलदार संतोष शिंदे यांना निवेदन दिले.

जव्हार, मोखाडा हे तालुके ९७ टक्के आदिवासी लोकवस्तीचे असून, येथील अल्प भूधारक व डोंगराळ भागातील शेती मुळे उत्पन्न सुद्धा पोटा पुरतेच असते. येथील जास्तीत जास्त शेती ही कोरडवाहू शेती आहे. खरीपाची ही शेती पुर्णत: पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीची कामं आटोेपल्यानंतर रोजगारासाठी येथे स्थलांतर सुरु होते. मात्र यंदा उणीपुरी शेतीही धोक्यात आली आहे. त्यातच मायबाप सरकारने जव्हार तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळल्याने शेतकरीवर्ग संकटात आहे.येथील प्रमुख पिकं भात, नागली, वरई, उडीद, तूर असून या वर्षी गेल्या दोन महिन्यापासून पावसाने अचानक दढी मारल्याने तोंडाशी आलेली पिकं करपून गेली आहेत. या वर्षीची संपूर्ण शेती वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सेनेपाठोपाठ कॉँग्रेसदुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेनी जव्हार तहसीलदारांना निवेदन देवून केली होती. दरम्यान, शुक्रवारी कॉँग्रेसनेही पुढाकार घेतला. यावेळी तालुकाध्याक्ष केशव गावंढा, अ.ज. पालघर जिल्हाध्यक्ष बळवंत गावित, जावेद पटेल, तसेच सागर सातपुते, रोहिदास दांडेकर, मनोज जाधव, संतोष शर्मा तेसच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.सरकारविरोधातील आंदोलनाला ग्रामीण भागातून पाठिंबाच्मोखाडा : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती दिसत असताना सुद्धा पालघर, तलासरी, विक्र मगड या तीन तालुक्याना दुष्काळ ग्रस्त शासनाच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर वाडा, मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळाने होरपळत असताना सरकार गप्प आहे.च्या धोरणा विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन रान उठवले असून शेतकºयांच्या हितासाठी पक्षांतील हेवेदावे, मतभेद विसरून मोखाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कॉग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत पालकमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेधाची होळी पेटवून बोंब ठोकणार आहे.च्या निषेधार्थ बाजारपेठेतील व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेऊन पाठिंबा देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. तर अनेक शेतकºयांच्या डोळ्यादेखत शेतातील उभी पिके जळाली. तरी सरकारला अजून जाग आलेली नसल्याने आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे