शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

उद्ध्वस्त कुटुंबांना मिळणार १०० टक्के अनुदान, २५० घरांची पडझड, वादळी वा-यासह बरसलेल्या पावसाने किनारपट्टीचे केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:17 AM

तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान देणार असल्याचे डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी लोकमतला सांगितले.

डहाणू : तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान देणार असल्याचे डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी लोकमतला सांगितले.डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पश्चिमेकडील आंबोली आणि करंजवीरा या गावांना चक्री वादळाचा फटका बसला असून ४० हून अधिक आदिवासींच्या घरांची छपरे उडून केली तर असंख्य आदिवासींच्या झोपड्याची अन्न, धान्याबरोबरच घरातील साहित्य कपडे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.आंबोली, पाटीलपाडा येथील यशवंत डोंगरकर, प्रकाश उंबरसाडा, सुरज उंबरसाडा, सुभाष गडत्र, रमेश विलास सखाराम उंबरसाडा, विजय उंबरसाडा, सुरेश शेंदडे, मधूतूºया अशी बेघर झालल्या कुटुंबीयांची नावे आहे. गेल्या बुधवारी डहाणूचे सहायक जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी वरील ठिकाणी भेट देऊन तलाठी यांनी पंचनामे करण्याची आदेश दिले होते.पावसाच्या तडाख्याने ठिकठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. डहाणूच्या किनारपट्टीवरील सतीपाडा, डहाणूखाडी, बाडा पोखरण, आसनगाव येथील सुमारे २० घरांची पडझड होऊन नुकसान झाली तर तालुक्यात सर्वात जास्त चक्रीवादळाचा तडाखा वावडा, वानगाव भागातील गाव पाड्यांना बसला आहे. या वादळाच्या ताडख्यात वानगांव, चिंचणी रस्त्याचा दुतर्फा बागायती उदध्वस्त झाल्या आहेत. केळी, फणस, आंबे, भोपळा यांची रोपे उन्मळून पडल्याचे बबन चुरी, धनंजय पाटील, रामचंद्र सावे, सुरेंद्र पाटील, विवेक कोरे यांनी सांगितले.