शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:03 AM

जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर

पालघर : जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर ह्यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांनी पुरस्काराचा स्विकारला.जि.प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. ‘शौचालय असेल तरच बोला’ असा फलक आपल्या कार्यालयात लावून त्यांनी हागणदारी मुक्तीसाठी आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते. २ आॅक्टोबर २०१७ रोजी पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा शासनाने केली. त्याबद्दल शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ह्या सन्मानाचा स्वीकार केला.पालघर जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १ लाख ३३ हजार १५२ इतकी होती. २०१४-१५ मध्ये १४ हजार १६३ शौचालय, २०१५-१६ मध्ये १४ हजार १६१ शौचालय, २०१६-१७ मध्ये ७० हजार २६० शौचालये आणि २०१७-१८ मध्ये २४ हजार ०८८ इतक्या शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. तसेच ९ हजार ०५ कुटुंबे सामुदायीक व सार्वजनिक शौचालयचा वापर करत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ५८ ग्रामपंचायती, २०१६-१७ मध्ये १०३ ग्रामपंचायती आणि २०१७-१८ मध्ये ११ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या.या मोहिमेला दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाला विशेष प्रयत्न करावे लागले. अजुनही काही वाढीव कुटूंबे तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यात लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी अनके विशेष उपक्र म सातत्याने राबविण्यात भर द्यावा लागणार असला तरी किनारपट्टीवरील गावातून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तेथे अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. या कार्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पाणी व स्वच्छता विभागच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी प्ररिश्रम घेतले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर