शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:50 PM

Vasai-Virar : एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे.

- आशिष राणे

वसई : वाढता कोरोना, त्यात एप्रिलचा कडकडीत महिना आणि सोबत उन्हाळा आला की बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे वास्तव सर्वत्र पाहायला मिळते; परंतु उर्वरित भागांत जरी पाणीटंचाई भासत असली तरी वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणात जूनअखेरपर्यंतचा पाण्याचा साठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातील सूर्याच्या धामणी धरणात वर्षभर पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा असतानाही वसई-विरारच्या काही भागांत पाणीटंचाई असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. याविरोधात काही दिवसांपूर्वी पालिकेवर हंडा मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान, वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करणारी पालघर व वसई तालुक्यात एकूण तीन धरणे असून, यापैकी धामणी (सूर्या ) धरणात आजच्या घडीला ४६ टक्के इतका मुबलक पाणीसाठा आहे, तर पालिकेच्या पेल्हार धरणात ३७ टक्के आणि उसगाव धरणात ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यापर्यंत तरी पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही असेच या धरणांतील शिल्लक पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सदोष जल वितरण व्यवस्थेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अर्थातच नुसत्या योजना नकोत तर तांत्रिकदृष्ट्या कोणतीही योजना परिपूर्ण झाली नाही. पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर केल्यास नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.- सुदेश चौधरी, माजी स्थायी समिती सभापती

पेल्हार व उसगाव धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठा आहे, तर धामणी (सूर्या) धरणात वर्षभर पुरेल इतका साठा आहे. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे. कारण कोरोनामुळे सतत हात धुवावे लागत असल्याने पाण्याचा जास्त वापर होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे.- सुरेंद्र ठाकरे, पाणीपुरवठा अभियंता, वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार