शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

एकरी ४० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 22:57 IST

विश्वनाथ पाटील : ओला दुष्काळ जाहीर करा

वाडा : अवकाळी पावसामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून ९० टक्के भातपीक नष्ट झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन शासनाने पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट एकरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी वाडा येथील पत्रकार परिषदेत केली.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कापणीसाठी तयार झालेल्या भात पिकाची नासाडी केली आहे. सततच्या पावसाने भात पीक सतत पावसात बुडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या नुकसानीला पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही शासनाकडून पंचनामे करण्यासाठी विलंब होत आहे. तसेच विमा कंपन्यांकडूनही विम्याचे दावे दाखल करण्यासाठी जाचक अटी लादण्यात येत आहेत. त्यामुळे अगोदरच संकटात असणाºया शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत आहे.शेतकºयांची ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन पीक विमा कंपन्यांनी पंचनाम्याच्या जाचक अटीचा आग्रह न धरता शेतकºयांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी असेही पाटील म्हणाले.यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणांचा पुरवठा करावा, तसेच भात पीक शेतकºयांच्या हातून गेल्याने शेतकºयांसाठी खावटीसाठी रेशनिंगवर अल्प दरात धान्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. शेतकºयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकºयांची निर्धार सभा येत्या ९ नोव्हेंबर रोजी वाडा येथील पी.जे.हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली असून यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वनाथ पाटील यांनी केले आहे. यावेळी कुणबी सेनेचे वाडा तालुका प्रमुख प्रल्हाद शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणीच्जव्हार : सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते तसेच शेतकºयांनी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकाºयांकडे निवेदन देत केली आहे.च्दिवाळी संपली तरी पाऊस काही उघडण्याचे नाव घेत नाही. सततच्या या पावसामुळे भात पीक, नागली पिकून तयार झाली आहेत. पीक तयार झाल्याने अनेक शेतकºयांनी भात पीक कापून वाळत टाकले आहेत. पाऊस रोजच येत असल्याने पूर्ण कापून टाकलेले पीक पुरात वाहून जाऊन शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसने अप्पर जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यावेळी काँग्रेस आदिवासी जिल्हा संघ अध्यक्ष बळवंत गावीत, तालुकाध्यक्ष केशव गावंढा, माजी उपनगराध्यक्ष धनंजय खेडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.दलित पँथरचे मोखाडा तहसीलदारांना निवेदनमोखाडा : परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकºयाला भरीव मदत द्यावी, या मागणीचे निवेदन दलित पँथर संघटनेच्यावतीने मोखाडा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विभागीय जिल्हा अध्यक्ष बबलू शेळके, मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा, मोखाडा तालुका महासचिव कल्पेश लोखंडे, शहर अध्यक्ष इरफान शेख, शंकर भोये उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरीRainपाऊस