शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नालासोपारा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्समुळे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:53 IST

Mumbai Local : गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्याने नालासोपारा स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

नालासोपारा - गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्याने नालासोपारा स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. रेल्वेसेवा सुरू झाली तरी प्रवाशांमध्ये राज्य सरकारने ठेवलेले वेळापत्रक, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्स या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात नाराजी होती. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस आणि जीआरपी व आरपीएफ पोलिसांनी रात्रीपासूनच रेल्वे स्थानकांच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.लॉकडाऊननंतर बंद केलेली रेल्वेसेवा १ फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांसाठी काही सिमीत ठेवलेल्या वेळेत सुरू करण्यात आली आहे. दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत आणि नंतर रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत सामान्य प्रवासी प्रवास करणार आहे. कामावर जाण्याची वेळ सकाळीच असल्याने सकाळची वेळ राज्य सरकारने द्यावी, अशी विनंती प्रवाशांनी केली आहे.१२ वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ९ वाजल्यापासून तिकीट काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तीन तास रांगा लावून रेल्वेचे तिकीट मिळाल्यावर काही जणांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आयडी, तिकीट रेल्वे पोलीस तपासून रेल्वे स्थानकांवर पाठवत होते. ज्यांच्या तोंडाला मास्क नाही त्यांना रेल्वे स्थानकांवर येण्यास बंदी घातली होती. स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची काळजी रेल्वे पोलिसांनी घेतली होती. रेल्वे पोलीस माईक, रेल्वेच्या अनाऊन्समेंट करून सामान्य नागरिकांना आवाहन करत होते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिकिटांच्या खिडक्या वाढवल्या नसल्याने तिकिटांसाठी तुफान गर्दीचे चित्र नालासोपारा येथे दिसत होते. वेळेवर तिकीट न मिळाल्याने रेल्वेने प्रवास करता आला नाही म्हणून रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.  सामान्य प्रवाशांसाठी रेल्वेची योग्य सुविधा नसून ज्यांच्याकडे आयडी आहे, सरकारी कर्मचारी यांनाच रेल्वेची सुविधा मिळत आहे. सामान्य चाकरमानी प्रवासी सकाळी ७ वाजता रेल्वेने नऊ वाजेपर्यंत कामाला जातात, पण ती वेळ प्रवासासाठी ठेवलीच नाही.- राजेंद्र माने, संतप्त प्रवासीरेल्वेतून प्रवास करण्यासाठी दिलेल्या वेळेतच सामान्य नागरिकांनी प्रवास करावा यासाठी आवाहन करत असून चोख बंदोबस्त रेल्वे स्थानकांवर ठेवण्यात आला आहे.- सचिन इंगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस

तब्बल १० महिन्यांनंतर सामान्य प्रवाशांसाठी विरारहून सुटली पहिली लोकल वसई : विरार-चर्चगेट ही मुंबई उपनगरीय लोकल सेवा अखेर सोमवारी १० महिन्यांनंतर सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. विरार रेल्वेस्थानकातून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पहिली विरार-चर्चगेट लोकल सेवा तुरळक प्रवाशांच्या हजेरीत सुरू होताच प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. राज्य सरकारने प्रवाशांच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेत तब्बल १० महिन्यांनंतर कोरोनाचे संकट थोडेफार दूर झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी मुंबई उपनगर शहरांची लाइफलाइन असलेली उपनगरीय विरार ते चर्चगेट अशी लोकल सेवा सुरू केली आहे. कोरोना संसर्गामुळे मागील १० महिने ही लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक स्टेशनकडे फिरकलेदेखील नव्हते.मात्र सोमवारी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहाटेपासूनच तिकीट खिडकीवर प्रवाशांची लगबल पाहायला मिळाली, तर वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडक्या मोजक्याच उघडल्याने थोड्याफार रांगा तिकिटासाठी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. अर्ध्या तासाहून अधिक वेळ सर्वसामान्य प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागले. 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेVasai Virarवसई विरार