शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

गडकिल्ले, पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या अतिउत्साहींवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 03:23 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशांचे उल्लंघन : पर्यटकांकडून होते मोठी गर्दी

पालघर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीतील काळदुर्ग या पर्यटनस्थळावर, नदी-नाले, धबधब्यांवर सध्या पर्यटकांकडून मोठी गर्दी केली जात असून जिल्हाधिकाºयांचा मनाई आदेश मोडून तरुणांचे मोठे गट पावसाचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई आदेश असतानाही कायद्याला न जुमानणाºया बेशिस्त लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.

पालघरमधील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे, नद्या, गडकिल्ले या ठिकाणी जाण्यास कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर व धोकादायक परिस्थिती उद्भवत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मनाई आदेश काढून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र या आदेशाला जिल्ह्यातील नागरिक केराची टोपली दाखवत असल्याचे समोर येते आहे. जव्हारच्या धबधब्यात अलीकडेच अपघात होऊन पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्याकडे दुर्लक्ष करून रविवारी, सोमवारी असणाºया सलग सुट्ट्यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात नागरिक गडकिल्ल्यांना भेटी देत आहेत. वाघोबा खिंडीतील काळदुर्ग किल्ल्यावर नागरिक ट्रेकिंगसाठी मोठी गर्दी करत असून पावसाचा आनंद लुटण्यासाठी लहान मुलांना घेऊन अनेक कुटुंबे नदी, धबधब्यांवर जात आहेत. एकीकडे जीवाला धोका तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असतानाही दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात लोक फिरत असून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही पर्यटक केवळ मौजमजा करण्याच्या निमित्ताने पर्यटनस्थळी येत आहेत, तर अनेक जण मद्यप्राशन करण्यासाठी येत असून सोबत महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सहभाग जास्त असल्याचे दिसून येत आहे.पालघर-मनोर महामार्गावरील काळदुर्ग हा डोंगर उंच असून येथे जाण्यासाठी केवळ पायवाटेचाच पर्याय आहे. पावसाळ्यात ही वाट अतिशय निसरडी असल्याने दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता असते. दुसरीकडे बिबळे, डुक्कर आदी जंगली श्वापदांसह सरपटणाºया विषारी जीवांचा वावरही पर्यटकांच्या जीवावर बेतू शकतो. मात्र अशा कुठल्याही धोक्याची पर्वा न करता फक्त धम्माल आणि काहीतरी अचाट फील अनुभवायच्या मस्तीसाठी सध्या शेकडो लोक फिरत आहेत.सध्या कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस, जिल्हा प्रशासन जीवापाड मेहनत घेत असताना काही बेकायदेशीर लोक प्रशासनाच्या कामात अतिरिक्त समस्या उभ्या करीत आहेत. अशा बेदरकार वागणाºयांवर कडक कारवाईसाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली. 

टॅग्स :palgharपालघर