शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

सिंगेंनी मागितली कोर्टाची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 2:31 AM

इन्स्पेक्टरने उद्योजकाचे १७ लाख लुबाडले; मुंबई उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

- हितेंन नाईकपालघर : सातपाटी सागरी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यानी पालघरचे उद्योजक शिरीष दलाल यांच्या कडून १७ लाख रुपये लाटल्या प्रकरणात पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्यावर उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागण्याची पाळी ओढवली. या प्रकरणी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत.माहीम येथे बिडको औद्योगिक, वसाहती मधील मे.युरो स्पाझीओ ह्या कंपनीचे मालक शिरीष दलाल ह्यांनी इंडियन बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणी सील केलेल्या आपल्या कंपनीतील काही मशिनरी विकल्याच्या बँकेच्या तक्रारी वरून सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक हातमोडे ह्यांनी दलाल ह्यांना अटक केली होती. त्यावेळी त्याच्या कडे असलेले डेबिट कार्ड, १६ हजार रोख रक्कम, मोबाईल आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. आपले कार्ड ब्लॉक करायचे कारण देऊन हातमोडे यांनी दलाल यांच्याकडून कार्डचा पिन नंबर मिळविला. तसेच एका आदिवासी संघटनेच्या सहकाºयांना हाताशी धरून व त्यांना दलाल यांच्याकडे पाठवून त्यांना जामीन लवकर मिळावा असे वाटत असेल तर त्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासाठी दलाल यांच्याकडून हातमोडे आणि त्यांच्या ७ साथीदारांनी साडेतीन लाख रु पये आणि डेबिट कार्ड व बँक खात्यातून १६ लाख रु पये काढून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करून लूट केल्याची तक्रार दलाल ह्यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षीका शारदा राऊत ह्यांच्या कडे केली होती.उद्योगपती दलाल ह्यांची जामिनावर सुटका झाल्या नंतर त्यांनी हातमोडे आणि त्यांच्या अन्य तीन सहकाºयांविरोधात सातपाटी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यात सत्र न्यायालयाने चौघांनाही अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांनी पुन्हा त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता दलाल ह्यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.अटकपूर्व जामिनाचे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता न्यायालयाने तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी निमीत गोयल यांना ह्या प्रकरणी प्रतिज्ञापत्रा द्वारे आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी गोयल ह्यांनी संबंधित आरोपी हे पोलिसांना तपासात सहकार्य करीत असल्याने त्यांना पोलीस कस्टडीची गरज नसल्याचे न्यायालयाला कळविले होते. सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. गडकरी यांच्या समोर हे प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर व उपलब्ध कागदपत्रांची पाहणी केल्यावर प्रथम दर्शनी हे प्रकरण अत्यंत गंभीर दिसत असल्याचे सांगून तक्र ारदारांनी अर्जदारा विरु द्ध केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत नोंदविले. तपास अधिकाºयाने कस्टडीची आवश्यकता नसल्याबद्दल जे निवेदन सादर केले त्या संबंधात प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे सांगून ह्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कागदपत्रे साक्षांकित करावीत असे स्पष्ट केले. न्यायालयात उपस्थित राहून अधिकारी गोयल ह्यांनी पोलीस अधीक्षक सिंगे ह्यांच्या ऐवजी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक राजरोशन तिलक ह्यांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. तक्रारदाराने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने हा न्यायालयाच्या बेअदबीचा प्रकार असल्याचे सांगून स्वत: पोलीस अधिक्षकांनाच हजर राहण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टVasai Virarवसई विरार