शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Coronavirus: कधी वाटले नव्हते, हा विषाणू आपले घर शोधत येईल! आपल्या प्रिय व्यक्ती गमवाव्या लागल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 02:47 IST

पालघर जिल्ह्यात वर्षभरात ४७,६४७ जण बाधित : १,२०९ रुग्णांनी गमावला जीव, कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला अन् यामध्ये माझे मोठे बंधू यांना कोरोनाबाधा झालाी. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ती परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हाला त्याचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही

सुरेश काटे/हितेन नाईक

पालघर : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून देशात गेल्या वर्षी २२ मार्चला जनता कर्फ्यू लावण्यात आला. संध्याकाळी सर्वांनी थाळीनाद केला आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. या वर्षभराच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात तब्बल ४७ हजार ६४७ जण कोरोनाने बाधित ठरले असून १ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५ हजार २८५ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे  घरातील माणसेसुद्धा रुग्णासोबत राहू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोरोनाने मला काय शिकवले,’ याविषयी घेतलेला हा आढावा. तलासरी : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांमुळे रुग्णसंख्या जास्त वाढत असून कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे लोकसुद्धा कोरोनाबाधित रुग्णापासून लांब राहात असून घरातील माणसेसुद्धा रुग्णासोबत राहू शकत नाहीत, अशी विचित्र परिस्थिती. त्यातच एखादा रुग्ण दगावला तर त्याच्या कुटुंबातील लोकांचा  आक्रोश ऐकून तर खूप वाईट वाटते. अंगावर काटा येतो. कधी वाटले नव्हते की, हा विषाणू आपलेही घर शोधत येईल. अन् झालेही तसेच. 

कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला अन् यामध्ये माझे मोठे बंधू यांना कोरोनाबाधा झालाी. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ती परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हाला त्याचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. कोरोना रुग्णाचा अंत्यविधी आपल्याला करता येत नाही. तो रुग्णालयामार्फत केला जाताे. ना अंत्ययात्रा, ना खांदा, ना रामनाम,  जीवाचा दगड लांबच राहिला, रुग्णालयातून बंद केलेली बॉडी रुग्णवाहिकेतून  स्मशानात  चेहरा न बघताच  अग्नी, कुठले मडके अन् फेरे,  तोंडात ना पाणी, ना तुळशीचे पान. येथेच आपले दुर्दैव संपत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबातील सर्वांची कोरोना टेस्ट करावी लागते. त्याहून मोठी शिक्षा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागते. तुरुंगापेक्षा वाईट अवस्था.  घराला नगरपंचायतीमार्फत टाळे लावले जाते. तेव्हा आपली जवळची माणसेसुद्धा आपल्यापासून लांब राहतात. कोणी बोलतसुद्धा नाही. शेजारी तर आपण फार मोठा गुन्हा केला आहे अशा नजरेने हळूच दार उघडून आपल्याला बघतात. तेव्हा खऱ्या अर्थाने समजते कोण आपले आणि कोण परके? कधी कधी वाईटातूनही चांगले घडते. गेल्या वर्षात कोरोनामुळे हिंदुस्थानी जनतेला चांगले काय दिले तर कटाक्षाने पाळावी लागणारी स्वच्छता. स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवायचे काम या कोरोना नावाच्या इवल्याशा विषाणूने एका झटक्यात करून दाखविले.

आपल्या प्रिय व्यक्ती गमवाव्या लागल्या!

पालघर :  संपूर्ण जगाला कोरोनाने वेठीस धरल्याची ओरड सर्वत्र दिसून येत असताना कोरोनाने काही  सकारात्मक तर काही नकारात्मक अंगाने अनेक बदल घडविल्याचे पाहावयास मिळाले. आमचा समुद्र, खाड्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाने काळवंडून त्यावर जगणाऱ्या हजारो गरीब मच्छीमार कुटुंबांचे मासेमारीचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले होते. कोरोनामुळे औद्योगिक कारखान्याची धडधड कमी झाल्याने आपोआपच प्रदूषण कमी होत समुद्र, खाड्या स्वच्छ झाल्याने माशांची आवक वाढत शेकडो गरीब कुटुंबांना पुन्हा रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याचे दिसले. त्याचप्रमाणे या कालावधीत काही कुटुंबीयांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावे लागल्याच्या घटना मनाला खूप वेदना देणाऱ्या ठरल्या.जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी, पालघर बिडको, जेनेसीस उद्योग समूहासह अनेक औद्योगिक क्षेत्रात नोकरीनिमित्त जाणाऱ्या स्थानिक कामगारांना आपल्या नोकरीवर पाणी फेरावे लागले.  औद्योगिक क्षेत्रात काम करणारा परप्रांतीय मजूरही गावी निघून गेल्याने कारखान्यांची धडधड थांबली. परिणामी बोईसर एमआयडीसीमधून होणारे प्रदूषण थांबल्याने दांडी, उच्छेळी, नवापूर, आलेवाडी, मुरबे, सातपाटी, वडराई अशा किनारपट्टीवरील गावांसमोरील प्रदूषणाने काळ्या-पिवळ्या पडलेल्या खाडी, समुद्राचे पाणी स्वच्छ व नितळ झाल्याचे पाहावयास मिळाले. परिणामी प्रदूषणाने रॉकेलमिश्रित वास येत असल्याने खाडीतील उपळ्या-वाड्या शिंपल्या, बोय, चिंबोरी, कालवे आदी माशांना नाकारणारी स्थानिक मंडळी पुन्हा बाजाराकडे वळू लागली. समुद्रात स्वच्छ पाणी येऊ लागल्याने माश्यांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे शेकडो कुटुंबीयांची पावले जाळी, टोपल्या घेऊन पुन्हा समुद्र, खाड्यांकडे वळली असून अनेक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू झाल्याचे पाहावयास मिळते. याव्यतिरिक्त रोजगार, नोकऱ्यां-निमित्ताने घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मंडळी भेटू लागली. मोबाईलद्वारे बोलू लागली. भेटू लागली. वाचन वाढले. अशा गतकाळात हरवून बसलेल्या सकारात्मक बाबीही उपभोगायला मिळाल्या. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस