शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:56 IST

Coronavirus : देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली

वसई - देशभरात वाहतुकीचे लहान-मोठे ट्रक विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्गावर "जैसे थे" स्थितीत उभे आहेत. महामार्गावर आजूबाजूला कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची सोय नसल्याने आज हजारो ट्रकचालक व क्लिनरचे मात्र हाल सुरू असल्याचे चित्र सध्या वसईच्या मुंबई-अहमदाबाद स्थित चिंचोटी महामार्गावर आढळून आले आहे. विशेष म्हणजे आता या उभ्या असलेल्या वाहतूक ट्रक चालकांनी आपलं सामान ट्रकमधील मागील बाजूस गाडीत ठेवलं असून तिथे आपली जेवणाची चूल देखील मांडली आहे.

देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली आणि या सर्वांनी मिळेल त्या ठिकाणी आपले मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला किंवा खुल्या जागेवर व बहुतांश पेट्रोल पंप ठिकाणी उभे केले.परिणामी लॉकडाऊननंतर ट्रक उभे करून आठ दिवस झाले आहेत. सर्वत्र महामार्ग असल्याने जवळ काहीच मिळत नाही. आजूबाजूची दुकानं, हॉटेल व इतर अत्यावश्यक बाबी ही बंद असल्याने ट्रक चालकांच्या खाण्यापिण्याचे हाल  झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे

ट्रक चालकांकडचे पैसे ही संपले असल्याने काहींचे तर जेवणाचे देखील हाल झाले आहेत. तर काहींनी ज्यांच्या जवळ ट्रकमध्ये स्टो व भांडी आहेत त्यांनी रेशन आणून गाडीतच चूल मांडून तिथे आपला संसार थाटला आहे. याउलट ज्यांच्याकडे काहीच नाही त्या ट्रक चालकांना आजूबाजूला असणाऱ्या गावातून जेवण, नाश्ता व पाणी पुरवत आहे. तर काहींजवळ असलेल्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने किंवा जवळ पैसे नसल्याने दूरवर असलेल्या घरच्यांना फोन ही करू शकत नाही.

बाहेर पडले तर पोलीस मारतात तर पूर्ण दिवस गाडीत बसून व थोडे फार ट्रक भोवती फिरून हे सामान्य ट्रक चालक आज कधी उपाशी पोटी तर मिळाले तर मिळाले जेवण असे काहीसे दिवस काढत आहेत. या संदर्भात बबली गुप्ता यांनी सांगितले, की आज आमच्याकडे पैसे नाही, पुढचे अनेक दिवस काढायचे आहेत. बिहारला पोचायचं आहे आम्ही यातून काय मार्ग काढणार अशी आर्त हाक मारत या वाहनचालकांनी त्यांची व्यथा मांडली.

सरकारने ट्रक चालकांना मदत केली पाहिजे !

नेहमीच सरकारला योग्य सहकार्य करा, दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करा वाहतूक एकजूट अशीच ठेवा, असे संघटनेकडून सांगितले जाते. त्यामुळे वाहतूकदार हा देशाचा कणा आहे त्यामुळे आलेल्या कोरोना संकटाचा ते अशा प्रकारे सामना करत आहेत त्यामुळे सरकारने ही त्यांची योग्य काळजी घ्यावी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार