शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:56 IST

Coronavirus : देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली

वसई - देशभरात वाहतुकीचे लहान-मोठे ट्रक विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्गावर "जैसे थे" स्थितीत उभे आहेत. महामार्गावर आजूबाजूला कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची सोय नसल्याने आज हजारो ट्रकचालक व क्लिनरचे मात्र हाल सुरू असल्याचे चित्र सध्या वसईच्या मुंबई-अहमदाबाद स्थित चिंचोटी महामार्गावर आढळून आले आहे. विशेष म्हणजे आता या उभ्या असलेल्या वाहतूक ट्रक चालकांनी आपलं सामान ट्रकमधील मागील बाजूस गाडीत ठेवलं असून तिथे आपली जेवणाची चूल देखील मांडली आहे.

देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली आणि या सर्वांनी मिळेल त्या ठिकाणी आपले मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला किंवा खुल्या जागेवर व बहुतांश पेट्रोल पंप ठिकाणी उभे केले.परिणामी लॉकडाऊननंतर ट्रक उभे करून आठ दिवस झाले आहेत. सर्वत्र महामार्ग असल्याने जवळ काहीच मिळत नाही. आजूबाजूची दुकानं, हॉटेल व इतर अत्यावश्यक बाबी ही बंद असल्याने ट्रक चालकांच्या खाण्यापिण्याचे हाल  झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे

ट्रक चालकांकडचे पैसे ही संपले असल्याने काहींचे तर जेवणाचे देखील हाल झाले आहेत. तर काहींनी ज्यांच्या जवळ ट्रकमध्ये स्टो व भांडी आहेत त्यांनी रेशन आणून गाडीतच चूल मांडून तिथे आपला संसार थाटला आहे. याउलट ज्यांच्याकडे काहीच नाही त्या ट्रक चालकांना आजूबाजूला असणाऱ्या गावातून जेवण, नाश्ता व पाणी पुरवत आहे. तर काहींजवळ असलेल्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने किंवा जवळ पैसे नसल्याने दूरवर असलेल्या घरच्यांना फोन ही करू शकत नाही.

बाहेर पडले तर पोलीस मारतात तर पूर्ण दिवस गाडीत बसून व थोडे फार ट्रक भोवती फिरून हे सामान्य ट्रक चालक आज कधी उपाशी पोटी तर मिळाले तर मिळाले जेवण असे काहीसे दिवस काढत आहेत. या संदर्भात बबली गुप्ता यांनी सांगितले, की आज आमच्याकडे पैसे नाही, पुढचे अनेक दिवस काढायचे आहेत. बिहारला पोचायचं आहे आम्ही यातून काय मार्ग काढणार अशी आर्त हाक मारत या वाहनचालकांनी त्यांची व्यथा मांडली.

सरकारने ट्रक चालकांना मदत केली पाहिजे !

नेहमीच सरकारला योग्य सहकार्य करा, दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करा वाहतूक एकजूट अशीच ठेवा, असे संघटनेकडून सांगितले जाते. त्यामुळे वाहतूकदार हा देशाचा कणा आहे त्यामुळे आलेल्या कोरोना संकटाचा ते अशा प्रकारे सामना करत आहेत त्यामुळे सरकारने ही त्यांची योग्य काळजी घ्यावी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार