शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

coronavirus: तिप्पट वीजबिलांच्या बदल्यात डहाणूकरांच्या वाट्याला अंधार, नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:59 AM

महावितरणने लॉकडाऊनमधील तीन महिन्यांचे पाठवलेले वीजबिल पाहून येथील ग्राहकांचे डोळे फिरले आहेत.

डहाणू : डहाणू तालुक्याच्या किनारपट्टी भागात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, महावितरणने लॉकडाऊनमधील तीन महिन्यांचे पाठवलेले वीजबिल पाहून येथील ग्राहकांचे डोळे फिरले आहेत. चिंचणी, वाणगाव, वरोर या भागांत फिडरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे आधीच अडचणीतील व्यवसायावर परिणाम होत आहे. येथील नागरिकांना सतत वीज गायब होत असल्याने रात्ररात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे वीजबिले तिप्पट आणि सर्वत्र अंधार अशी स्थिती झाली आहे.कोरोनामुळे आधीच डायनिंगचा व्यवसाय आणि इतर उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच चिंचणी, वाणगाव, वरोर फिडरवरील सततच्या बिघाडामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यानंतरही महावितरणने वीजबिलाची मनमानी करून दुप्पटतिप्पट आकारणी करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. वीजबिले दुरुस्त करण्यासाठी कर्मचारीच न नेमल्याने ग्राहकांना बोईसर येथे हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यात वेळ आणि पैसाही खर्च होत आहे.लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले माफ करण्यची मागणी खासदार राजेंद्र गावित आणि आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. पण, त्याचाही परिणाम झालेला नाही.वीजबिलांत विविध शुल्कांची आकारणी केली आहे. शिवाय, एक ते १०० युनिटपर्यंत प्रतियुनिट तीन रुपये ४० पैसे दर असल्याने, दोनतीन महिन्यांच्या एकत्र वीजबिलाची आकारणी करून १०० युनिटवरील प्रतियुनिट सात रुपये ४३ पैसे याप्रमाणे आकारणी करून लूट सुरू आहे.वीजबिलमाफीबाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रीडिंगप्रमाणे एप्रिलपासून वाढलेल्या वीजदरानुसार बिलांची आकारणी केलेली आहे. बिलात काही तांत्रिक चुका असल्यास स्थानिक वीज वितरण कार्यालयात गेल्यास ती ताबडतोब दुरुस्त करून देण्यात येईल.- प्रताप मचिये, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पालघर

टॅग्स :electricityवीजpalgharपालघर