शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

सततच्या पावसाने विक्रमगडातील भातरोपे कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:42 PM

पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान :भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे जर पाऊस अजून लांबल्यास पावसाच्या या सातत्यामुळे भातशेती हे प्रमुख पीक अडचणीत येणार आहे.सर्वत्र भात लावणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. गेल्या बारा दिवसापासून सततचा पाऊस बरसत आहे. बारा दिवसापासून शेतात पाणी भरून रोपे बुडून गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकºयाची भात पिकाची रोपे कुजली आहेत. अद्यापही पाउस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकºयाच्या मुखीचा घास हिरावून घेतला जातो की काय? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पुरामुळे विक्रमगड तालुक्यातील काही भागातील भातरोपे वाहून गेली आहे. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत तर काहीच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली गेली आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे. झालेल्या शेतकºयाच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी हवे होतेमात्र तो मुसळधारपणे कोसळत आहे. लावणी झालेल्या भातपिकाची शेतामध्ये पाणी भरून असल्याने पिके पाण्यात बुडून आहेत. पिकाची मुळे व रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षात जसे भात पिकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.