शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

बोईसरला ५५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 1:13 AM

बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.

- पंकज राऊत बोईसर : आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.इराणी वाडी ग्राऊंडवर आयोजिलेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि आमदार रविंद्र फाटक, पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, आधार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष-सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याचे शिवसेना समन्वय प्रभाकर राऊळ, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, पालघर जिल्ह्याच्या शिवसेना महिला संपर्क संघटक दीपा पाटील, पालघर जिल्ह्याचे शिवसेना युवा अधिकारी राकेश पाटील, शिवसेना पालघर विधानसभा संघटक वैभव संखे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेन्द्र सिंग, पालघर तालुका प्रमुख (पालघर व डहाणू विधानसभा) अशोक भोईर, जिल्हा परिषद सदस्य रंजना संखे, मिताली राऊत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे, साळुंखे व वीणा देशमुख, विदूर पाटील, वैदही वाढण आदी मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या गावातील वºहाडी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यात सहभागी झाले होते.आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार आदिवासी जोडप्यांचा विवाह पार पाडले असून अनेक वर्षांपासून त्यामार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखालील गरजूंचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जात असून प्रत्येक वर्षी वधू-वरांना संसारास लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येते. जगदीश धोडी यांनी या विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोरगरीब सहभागी होत असून प्रत्येक वर्षी संख्या वाढत आहे. असे सांगितले तर हा सोहळा सामाजिक उपक्रम असून कर्ज न काढता येथे लग्न कार्य होते तर लग्नानंतर होणाºया मुलांना शाळेत पाठवा. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका दारूने समाज बिघडवतो. म्हणून दारूपासून लांब राहा, असे खासदार गावित यांनी सांगितले.लग्न करण्यासाठी संपूर्ण गावाला भरपूर दारू पाजून मांसाहारी जेवण देणे आदिवासी समाजात अनिवार्य असते, त्यासाठी प्रचंड खर्च येतो तेवढा पैैसा जवळ नसल्याने अनेक आदिवासी कर्ज काढून त्या बदल्यात लगीन गडयाची वेठबीगारी पत्करतात म्हणजे कर्ज फिटेपर्यत त्या नवरा बायकोने कर्ज देणाºयाकडे वेठबिगार म्हणून राबायचे अशी घातक प्रथा या समाजात आहे. तिचे उच्चाटन या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रूपाने घडवून आणले जाते आहे.

टॅग्स :marriageलग्न