शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

एलएक्यूनंतरही भूमिका ठाम, जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:36 IST

प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरित लवादा कडून मिळालेल्या सूचनांनुसार एमआयडीसी व एमपीसीबी विरोधात कडक कारवाईचे अस्त्र जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उगारल्यानंतर त्यांच्या विरोधात एलएक्यू सादर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला.

हितेन नाईकपालघर : प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरित लवादा कडून मिळालेल्या सूचनांनुसार एमआयडीसी व एमपीसीबी विरोधात कडक कारवाईचे अस्त्र जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उगारल्यानंतर त्यांच्या विरोधात एलएक्यू सादर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पर्यावरणाला हानी पोचिवणाºया कारखान्या विरोधात माझी कारवाई सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली.नवापूर च्या समुद्र किनाºयावर ९ एप्रिल रोजी प्रदूषित सांडपाण्यामुळे खाडीतील हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने शुक्रवारी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, मच्छीमारांची व स्थानिकांचे म्हणणे ऐकून उपाययोजना आखण्यासाठी सातपाटी येथे जिल्हाधिकारी यांनी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालघरचे आमदार अमित घोडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, तहसीलदार महेश सागर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एम. एस. कलकटकी, उप अभियंता सी.एस. भगत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त युवराज चौगले, जि.प.सदस्य सचिन पाटील, मच्छिमार नेत्या पूर्णिमा मेहेर, ज्योती मेहेर, उज्वला पाटील, वैभव संखे तसेच मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अभामास परिषदेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदूषणामुळे पर्यावरणाचे झालेल्या नुकसानीची भरपाई कोणत्याही पद्धतीने भरून येऊ शकत नाही असे प्रतिपादन पालघर जिल्हाधिकाºयांनी सातपाटी येथील प्रतिपादन केले. मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अखिल भारतीय मांगेला समाजाचे प्रतिनिधी तसेच नवापूर, सातपाटी, मुरबे येथील नागरिकांनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, समस्या व त्यामुळे नागरिक व मच्छीमार व्यवसायावर होणाºया परिणामाची माहिती दिली. तारापूर औद्योगिक वसाहतीमधून होणारे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच एमआयडीसी हे विभाग अपयशी ठरत असल्याचे मान्य करत अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले.राज्यातील समुद्री जीवना विषयीचा आढावा घेण्यासाठी शासनाने डॉ. चंद्रप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी २०१६ रोजी शासन निर्णय जारी केला असून मत्स्यव्यवसाय विभागाने पालघर भागातील उपलब्ध माशांचें नमुने या समिती पर्यंत पोहचवून या समितीची पालघरमध्ये बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.राष्ट्रीय हरित लवाद यांच्या मार्गदर्शना नुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करून त्यामध्ये बाधित गावचे सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक तसेच मच्छीमार सहकारी संस्थेचे प्रतिनिधी यांच्या यांच्यामार्फत खाडीत तसेच विविध ठिकाणांच्या समुद्राचे पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या सोबीतने घेण्याचे ठरले.>५० एमएलडी सामुदायिक प्रक्रिया केंद्राला उपस्थितांचा विरोधनवापुरच्या घटने नंतर मृत माश्याचे सॅम्पल तपासणीसाठी न पाठविणाºया अधिकाºया विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नारनवरे यांनी दिले. पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने माश्याच्या मृत्यू झाल्याची बाब प्रो.भूषण भोईर यांनी अधोरेखित केले. ही बाब जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सायनाईड, पेस्टीसाईड आदी घातक रसायने पाण्यात असण्याची शंका व्यक्त करून मृत माश्याच्या सॅम्पल च्या तपासणी नंतर सत्य समोर येईल असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जर २५ एमएलडी प्रक्रि या केंद्रातून नवापुरच्या किनाºयावर सोडण्यात येणाºया पाण्यात प्रदूषण आढळून येत असताना ७.१ किमी आत समुद्रात ५० एमएलडी सामुदायिक प्रक्रि या केंद्रातून पाणी सोडल्यास प्रदूषणाची गंभीरता कळणार नसल्याचे सर्वांनी सांगितले.>‘त्या’ उद्योगांची होणार पाहणीया समितीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, लेबर विभागाचे प्रतिनिधी राहणार असून या समिती मार्फत औद्योगिक वसाहतीमध्ये घातक घनकचरा निर्माण करणाºया उद्योगांची पाहणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ही पाहणी पूर्ण करून या समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आठवडाभरात बैठकीचे आयोजन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.