शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेत २५ कोटींच्या औषधाचा घपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:25 IST

प्रशासनाचे मौन : राजकुमार चोरघे यांचा महानगरपालिकेवर आरोप

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या तरतुदी महानगरपालिकेकडून गेल्या ६ वर्षात करण्यात आल्या. पण आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यासाठी मागविण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या औषधांचा काळाबाजार झाला असून या औषधांचे २५ कोटी कोणाच्या घशात गेले असा सवाल राजकुमार चोरघे यांनी केला आहे. वसई विरार महानगरपालिकेचा आरोग्य विभाग किटकनाशके आणि औषधांवर करोडो रूपये खर्च करत असून हा खर्च फक्त कागदोपत्रीच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वसई येथील सर डी.एम.पेटिट रुग्णालय, नालासोपारा येथील नगीनदास पाडा येथील रुग्णालय, नालासोपारा व सातीवली येथील माता बाल संगोपन केंद्र आणि इतर आठ दवाखान्यामार्फत आरोग्य सेवा दिली जाते. डॉक्टरांची कमतरता, औषधांची उणीव आणि तुटपुंजी उपकरणे यामुळे आरोप आणि विवादामध्ये असणाऱ्या वसई विरार शहरातल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेल्या ६ वर्षात २५ करोड ३५ लाख ६६ हजार रुपये औषधांसाठी खर्च झाले आहेत. मात्र हा खर्च कागदावरच मर्यादित असून त्या रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात वसई-विरार मनपाच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्यासाठी खरोखरच औषधांवर खर्च केला आहे का ? हा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या मनात येत असून याची चौकशी करावी, अशीही मागणी आता जोर धरु लागली आहे. याबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी तब्बस्सूम काझी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणूकीत घोषित केल्याप्रमाणे एसआयटीकडून याची चौकशी करावी अशी मागणी होते आहे.

कोणत्या साली कितीची औषधे खरेदी केली...२०१४-२०१५ साली १ कोटी ६९ लाख ७२ हजार२०१५-२०१६ साली १ कोटी ९० लाख ४२ हजार२०१६-२०१७ साली १ कोटी ७५ लाख ९२ हजार२०१७-२०१८ साली ५ कोटी२०१८-२०१९ साली ७ कोटी२०१९-२०२० साली ८ कोटीसहा वर्षात एकूण २५ कोटी ३५ लाख ६६ हजारांची औषधे खरेदी केली.

आरोग्य विभागाने ६ वर्षांमध्ये २५ कोटींची औषधे खरेदी केली पण ती रु ग्णांना मिळाली का याचा कुठेही ठोक ताळेबंद का नाही ? यात पारदर्शकता का नाही ? वैद्यकीय विभागाने छुप्या पद्धतीने औषधे बाहेर काढून काळाबाजार केला असल्याचा संशय आहे. हे प्रकरण संवेदनशील असून आयुक्तांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. औषधाचा काळाबाजार झाल्याने रुग्णांना औषधे मिळाली नसल्याच्या अनेक तक्रारी आहे. - राजकुमार चोरघे (आरोपकर्ते)