शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

चारशेपैकी १३० बस रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:05 IST

वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवा चालविणाऱ्या खाजगी ठेकेदाराने कराराचा भंग केला असून चारशे पैकी केवळ १३० बसेस शहरातील रस्त्यावर चालवून प्रवाशांची घोर फसवणक केली आहे.

वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवा चालविणाऱ्या खाजगी ठेकेदाराने कराराचा भंग केला असून चारशे पैकी केवळ १३० बसेस शहरातील रस्त्यावर चालवून प्रवाशांची घोर फसवणक केली आहे. त्यामूळे महानगरपालिकेतील परिवहन घोटाळा उघडकीस आला आहे. करार केलेला असताना महानगरपालिकेनेही बेकायदेशीरपणे कराराला दहा वर्षांचा मुदतवाढ देऊन ठेकेदाराला पाठिशी घातले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चरण भट यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे.वसई विरार महानगरपालिका स्थापनेनंतर २०१२ साली प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली. मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत ही परिवहन सेवा चालवली जाते. या परिवहन सेवेबाबत अनेक तक्र ारी सातत्याने येत असताना आता ठेकेदाराने मोठा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे. करार करताना ठेकेदाराने ४०० बस शहरातील नागरिकांसाठी देण्याचे ठरवले होते. त्यानुसार पहिल्या तीन वर्षात टप्प्या टप्प्याने या बसेस येणार होत्या.२०१२ ते २०१५ या वर्षात या बसेस येणे अपेक्षित होते. परंतु २०१९ उजाडला तरी केवळ १३० बसेस पालिकेकडे आल्या.४०० बस नसल्याने महापालिकेचे रॉयल्टी पोटी मिळाणारे उत्पन्नही बुडाले आहे. प्रत्येक बस मागे पालिकेला एक हजार रुपयांची रॉयल्टी मिळणार होती.>गाड्यांची संख्या रोडावल्याने, प्रवाशांची मात्र झाली परवडवसई विरारचा वाढती लोकसंख्या व त्याचबरोवर सुरक्षीत प्रवासासाठी बसचा आधार सर्वसामान्य लोक घेत असतात. कमी बसेस रस्त्यावर चालू असल्याने प्रवाशांची मात्र परवड होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही वसईतल्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे आणि हा मोठा घोटाळा आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे.ठेकेदाराने प्रवासी कर आणि बालपोषण अधिभार शासनाला भरायचा असतो. पालिकेने तो ठेकेदाराकडून वसूल करायचा असतो. मात्र अद्याप हा कर ठेकेदाराने भरलेला नाही.आतापर्यंत या कराची रक्कम ५ कोटींच्या घरात गेलेली आहे. या कराच्या विरोधात सर्व महापालिका न्यायालयात गेल्याने प्रकरण प्रलंबित आहे. म्हणून कर भरला नाही, असे परिवहन ठेकेदार मनोहर सत्पाळ यांनी सांगितले.>परिवहन समितीकडून ठेकेदाराची पाठराखणमेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी कंपनीच्या ठेकेदाराने ४०० बस प्रवाशांच्या सुविधेसाठी आणायच्या होत्या. परंतु महानगरपालिकेने ठेकेदाराऐवजी स्वत: जेएनएनयूआरएम (जवाहरलाल नागरी पुनरूत्थान योजना) अंतर्गत १०० बस मागविण्याचे ठरवले.त्यातील ३० बसेस आणल्या. पंरतु या बस एवढ्या भंगार आणि निकृष्ट दर्जाच्या होत्या की शेवटी पालिकेनेच या बसेसची खरेदी थांबवली. त्यामुळे ठेकेदाराच्या १३० आणि पालिकेच्या निकृष्ट ३० अशा १६० बसेस वसईच्या रस्त्यावर आहेत.वसईची लोकसंख्या २० लाखांच्या घरात असताना केवळ १६० बस असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाने खाजगी सेवेची परिवहन सेवा राबविताना केवळ ५ वर्षाची मान्यता दिली होती. त्यानुसार हा करार २०१७ साली संपणार होता.परंतु पालिकेने परस्पर शासनाची संमती न घेता दहा वर्षांचा करार केला. ठेकेदारावर पालिकेची मेहेरनजर का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी भट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. परिवहन समितीने मात्र ठेकेदाराची पाठराखण केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार