शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गावाच्या विकासाकरिता युवकांची एकजुट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:15 PM

खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : सोनेगाव (बाई) येथील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. यामुळे गावोगावी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्या. जेणेकरून युवकांमध्ये एकीचे बळ निर्माण होईल आणि या एकजुटीतूनच गावाचा विकासही साधता येईल, असे मत माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे यांनी व्यक्त केले.देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोनेगाव (बाई) येथे जय गुरुदेव क्रीडा मंडळाद्वारे ५८ किलो वजनगटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला देवळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर, अजय बाळसराफ, माजी पं.स. सदस्य अशोक सराटे, माणिक इंगळे, मनीष थूल, उपसरपंच संजय लोखंडे, ग्रा.पं. सदस्य महेंद्र धोपटे, माजी सरपंच अण्णाजी गोटे, गुणवंत धांदे, डॉ. नरेंद्रकुमार इंगोले, बाबाराव झाडे, संदीप आडकीने, रामकृष्ण उईके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.आ. कांबळे पूढे म्हणाले की, कबड्डी हा खेळ दरम्यानच्या काळात दुर्लक्षित झाला होता; पण आता पुन्हा युवकांचा कल या खेळाकडे वाढला आहे. गावोगावी कबड्डी स्पर्धेचे आयोजन होत आहे. सोनेगावातही युवकांनी मागील पाच ते सहा वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून मातीतील खेळाला प्रोत्साहन दिले आहे. यापूढेही ही स्पर्धा अशीच घेत राहावी. यासाठी आपण मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय सुदृढ आरोग्य या हेतूने युवकांनी गावोगावी व्यायामशाळा निर्माण करावी, त्यासाठीही सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद इंगोले यांनी केले. संचालन अ‍ॅड. मंगेश घुंगरुड यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी सरपंच चंद्रशेखर आडकीने यांनी मानले. सदर स्पर्धेत पंच म्हणून कबड्डीपटू गौतम गोटे, दीपक वैद्य व डॉ. अमर नाखले जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच जय गुरुदेव क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.चिमुकला समालोचक ठरला कार्यक्रमाचे आकर्षणकोणतीही स्पर्धा रोमांचक करण्यासाठी जशी खेळाडूंची आवश्यकता असते, तशी समालोचकाचीही भूमिका महत्त्वाची असते. उद्घाटन सामन्याप्रसंगी आ. रणजीत काबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील प्रज्वल वानखेडे या आठव्या वर्गात शिकणाºया चिमुकल्याने हातात माईक घेतला आणि समालोचन सुरु केले. एकीकडे कबड्डीचा सामना रंगत असताना तेवढेच रंगतदार समालोचन हा चिमुकला करु लागल्याने सर्व मान्यवरांचे लक्ष त्याच्याकडे वळले. समयसूचकता व प्रत्येक क्षणाला त्याची शब्दफेक पाहून सर्वांनाच त्याचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. गावात क्रिकेट सामने असो वा कबड्डीचे सामने त्यात हा चिमुकला समालोचक आपली भूमिका बजावत असल्याचे गावकरी सांगतात.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे