शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अबब! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ६.२५ कोटींचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 12:01 IST

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यात वर्षभरात कारवाईतीन हजारांवर दारू विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या

चैतन्य जोशी

वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असल्याने १९७४ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र, ही दारूबंदी केवळ नावालाच राहिली असून, गेल्या वर्षभराच्या कालावधीत पोलिसांनी तब्बल ६ कोटी २५ लाख ६२ हजार १६८ रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करुन गावठी दारूसाठा नष्ट केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील दारूविक्री रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. वर्धा, गडचिरोलीच्या धर्तीवर चंद्रपूरमध्येही दारूबंदी करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर वर्ध्यातही याचे पडसाद उमटले अन् काही सामाजिक संघटनांकडून वर्ध्यातील दारूबंदी उठविण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, वर्धा जिल्ह्याला गांधींचा, विनोबांचा वारसा लाभल्याने हे शक्य होऊ शकले नाही.

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो. पंचाची फितुरी न्यायालयात आरोपी दारूविक्रेत्याला निर्दोष सोडण्यास फायदेशीर ठरते. यामुळेच दारूविक्रेत्यांचे मनसुबे वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक येऊन गेले; पण दारूविक्री मात्र कायमस्वरुपी बंद झालेली दिसली नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कायदा करून स्थानबद्ध किंवा तडीपारीची कारवाई करण्याची नितांत गरज आहे.

न्यायालयात अनेक केसेस ‘पेंडिंग’

दारूविक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते. एकट्या वर्धा जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजारांवर दारूविक्रेत्यांच्या केसेस पेंडिंग असल्याची माहिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंचांची फितुरी. त्यातच पकडलेल्या दारूच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळत नाही. त्यामुळे न्यायालयाचा वेळही वाया जातो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एकतर खुली करा, अन्यथा बंद करा

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूविक्री सुरू आहे. अनेक दारूविक्रेते बनावट दारूची विक्री करतात. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जर दारूविक्री होतेच आहे तर कायमस्वरुपी खुली करा, अन्यथा पूर्णपणे बंद करा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीwardha-acवर्धाPoliceपोलिसalcohol prohibition actदारुबंदी कायदा