शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अबब! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ६.२५ कोटींचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 12:01 IST

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यात वर्षभरात कारवाईतीन हजारांवर दारू विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या

चैतन्य जोशी

वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असल्याने १९७४ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र, ही दारूबंदी केवळ नावालाच राहिली असून, गेल्या वर्षभराच्या कालावधीत पोलिसांनी तब्बल ६ कोटी २५ लाख ६२ हजार १६८ रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करुन गावठी दारूसाठा नष्ट केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील दारूविक्री रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. वर्धा, गडचिरोलीच्या धर्तीवर चंद्रपूरमध्येही दारूबंदी करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर वर्ध्यातही याचे पडसाद उमटले अन् काही सामाजिक संघटनांकडून वर्ध्यातील दारूबंदी उठविण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, वर्धा जिल्ह्याला गांधींचा, विनोबांचा वारसा लाभल्याने हे शक्य होऊ शकले नाही.

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो. पंचाची फितुरी न्यायालयात आरोपी दारूविक्रेत्याला निर्दोष सोडण्यास फायदेशीर ठरते. यामुळेच दारूविक्रेत्यांचे मनसुबे वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक येऊन गेले; पण दारूविक्री मात्र कायमस्वरुपी बंद झालेली दिसली नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कायदा करून स्थानबद्ध किंवा तडीपारीची कारवाई करण्याची नितांत गरज आहे.

न्यायालयात अनेक केसेस ‘पेंडिंग’

दारूविक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते. एकट्या वर्धा जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजारांवर दारूविक्रेत्यांच्या केसेस पेंडिंग असल्याची माहिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंचांची फितुरी. त्यातच पकडलेल्या दारूच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळत नाही. त्यामुळे न्यायालयाचा वेळही वाया जातो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एकतर खुली करा, अन्यथा बंद करा

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूविक्री सुरू आहे. अनेक दारूविक्रेते बनावट दारूची विक्री करतात. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जर दारूविक्री होतेच आहे तर कायमस्वरुपी खुली करा, अन्यथा पूर्णपणे बंद करा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीwardha-acवर्धाPoliceपोलिसalcohol prohibition actदारुबंदी कायदा