शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने घरी नेण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतदही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून सीतदहीला प्रारंभ : पावसामुळे कापूस उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतदही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेली बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकºयांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. या बोंडातून कापूस बाहेर येत आहेत. तो शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकºयांकडून सुरू झाले आहे. विदर्भातील शेतकºयांचे प्रमुख उत्पादन म्हणून कापसाकडे पाहिल्या जाते. कधी भावाच्या कमी अधिक प्रकारामुळे कापसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.मागील वर्षी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांकडून कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यात आले. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पऱ्हाटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे. कापूस वेचणीला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार शेतकºयांकडून शेतात सीतदही केली जात आहे. सध्या कापसाच्या शेतात बळीराजा या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.अशी करतात सीतदहीशेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. हे दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झाडांच्या मध्ये वाकाचा (आंबाडीच्या झाडाची साल) पाळणा बांधून शेतातील पाच गोटे पाण्याने धुऊन ते एका नव्या कापडाचा पाळणा करून टाकण्यात येतात. येथे त्याची पूजा करून तेथे नैवेद्य ठेवण्यात येतो. यानंतर सीतदही झालेल्या परिसरातील कापूस काढून तो एका टोपल्यात गोळा करून तो घरी आणून देवघरात ठेवतात. त्याची पूजा करण्यात येते. यानंतरच कापसाच्या वेचनीला प्रारंभ होतो.

टॅग्स :agricultureशेती