शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

पाण्याचे दुर्भिक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:44 IST

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये.

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये. पाण्यासाठी मोताद झालेल्या यवतमाळकरांना आठवडाभराचे पाणी साठवून ठेवण्याकरिता सुटी घ्यावी लागत आहे. १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून देणारी ही पाणीटंचाई असल्याची प्रचिती येत आहे. उन्हाळा जेमतेम सुरू झाला आहे. पुढे स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अनेक भागांची भिस्त टँकरवर असली तरी टँकरही येत नाही. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात तर चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. गावातील हातपंपच निकामी झाल्याने पाणी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नळयोजनेच्या विहिरींची पातळी अतिशय खोल गेली आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा एकदिवसा आड केला जात आहे. परिणामी नागरिकांना आठ दिवसानंतरच पाणी मिळत आहे. ग्रामसेवकाकडे तक्रार केली तरी तो दुर्लक्ष करतो. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील ग्रामीण दरवर्षी पाण्याच्या समस्येला सामोरे जातात. गोंदिया, भंडारातही स्थिती वेगळी नाही. उन्हाची दाहकता तशी फेब्रुवारीपासूनच जाणवायला लागली होती. मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. मात्र प्रशासनदरबारी नियोजनाचा अभाव असल्याने पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही, असे वाटायला लागले आहे. गुंडभर पाण्यासाठी दोन- दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळते. जंगलातही वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदा मार्चमध्येच जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागले आहेत. ही बाब वनखात्यासाठी अधिक चिंताजनक आहे. ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख असलेल्या विदर्भात वाघांची संख्या मोठी आहे. वाघांची तृष्णा भागविण्यासाठी वन विभाग दरवर्षी नियोजन करीत असतो. कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र यंदा हे काम आतापासूनच हाती घेण्यात आले आहे. नैसर्गिक पाणवठे आटत चालल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढत असताना कृत्रिम पाणवठ्यात शिकाऱ्यांकडून विषप्रयोग करून प्राण्यांची शिकार करण्याची भीती आहेच. एकंदरीत यंदाचा उन्हाळा डोळ्यातून पाणी आणणारा ठरू शकतो.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई