शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

तालुक्यात दहा गावांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:18 AM

एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची गरज

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. यात या दहा गावांतील ४ हजार ८८८ लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.आर्वी तालुक्यातील धनोडी, टेंभरी, परसोडी, एकलारा, कर्माबाद, पिंपळझरी, मारडा, दिघी, साखखेडा, हिवरा या दहा गावांचा पाणीटंचाईत समावेश आहे. याबाबत १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई उपाययोजना कृती आराखडा अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनेला सुरूवात झाली आहे. आर्वी तालुक्यातील या दहा गावांना पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.या दहा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी २२ सार्वजनिक विहिरी, २२ खासगी विहिरी, ३१ हातपंप, दोन विद्युतपंप व सहा नळयोजना अशा उपाययोजना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सूचविण्यात आल्या आहेत. हे सर्व पाण्याचे स्त्रोत असले तरी नवीन कृती आराखड्यानुसार एक सार्वजनिक विहीर खोल करणे, तीन गावांत खासगी विहिरीचे बांधकाम करणे तथा अधिग्रहण करणे, सहा ठिकाणी नवीन हातपंप बसविणे, धनोडी व एकलारा या गावात नळयोजनेची विहीर दुरूस्त करणे, टेंभरी येथे पाईपलाईन दुरूस्त करणे, आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला अआहे. यात या गावांत येत्या तीन महिन्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दखल घेत कार्यवाही करणे गरजेचे आहे.आर्वी तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृती आराखड्यांतर्गत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहित करणे तथा नळयोजना व इतर तातडीच्या उपाययोजना आखणे सुरू आहे.- प्रा. धर्मेंद्र राऊत, उपसभापती, पं.स. आर्वी.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई